Thursday, 4 August 2022

2. हुमायून व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०)

 

प्रकरण १. इ हुमायून  व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०) 

 

बाबरच्या मृत्युनंतर त्याचा वडील मुलगा नासिरुद्दीन महंमद हुमायून इ.स. १५३० मध्ये दिल्लीचा सम्राट झाला. गादीवर आल्यानंतर हुमायूनला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. 

 

१. हुमायून पुढील अडचणी : 

 

·         हुमायूनने आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे काबूल व पंजाब हे प्रांत कामरानला दिले. हिंदालला संबळची सुभेदारी दिली आणि मिर्झा अस्करीस मेवाडची जहागिर दिली. पूढे हे भाऊ स्वतंत्र झाल्याने हुमायूनचे मोठे नुकसान झाले काबूल व पंजाब ताब्यात न राहिल्याने तिकडून येणारे काटक व शूर सैन्य हुमायुनला मिळणे कठीण झाले. भावाच्या स्वार्थी धोरणाकडे दुर्लक्ष केले. 

·         बंगाल व बिहारमधील अफगाण सरदार पुर्वीपासुन त्याच्या विरोधात होते. हुमायुनचा कट्टर शत्रू म्हणजे महंमद लोदी त्याने सिहांसनावरील हक्क सोडलेला नव्हता. शेरशहासूर या दुसऱ्या अफगाण अमिरालाही अफगाणांचे स्वतंत्र राज्य स्थापन करावयाचे होते. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा सुध्दा अफगाणांना मदत करीत होता. 

·         आलमखानने गुजराथचा सुलतान बहादुरशाहचा आश्रय घेतला होता. बहादुरशाहने अफगाणांना पूर्णपणे पाठिंबा दिला त्यामूळे त्याचा ही बंदोबस्त करणे गरजेचे होते. संकटकाळी त्याच्या भावांनाही त्याला मदत केली नाही. म्हणून हुमायुनला बऱ्याच अडचणींनी तोंड द्यावे लागले.

 

२. चुनारगडचे पहिले युध्द (१५३२):

 

बाबरच्या मृत्यूनंतर बिहारमध्ये अफगाणांनी पुन्हा डोके वर काढले. महंमद लोदीने प्रचंड सैन्य जमवून जौनपूरवर स्वारी केली. हुमायूनने त्याचा दोहरीयाच्या लढाईत पराभव केला. या लढाईच्या दरम्यान शेरशहा सुरी नावाच्या एका अफगाण सरदाराने चूनारगडच्या किल्ल्यावर चार महिने वेढा दिला. शेवटी समेट होऊन किल्ला शेरशहाकडेच राहिला. चुनारगडसारख्या लष्करीदृष्टया महत्वाचा किल्ला शेरशहाकडे राहू देण्यात हूमायूनने मोठी चूक केली.

 

३. चूनारगडचे दुसरे युद्ध (१५३७):

 

हुमायूनचा गुजराथच्या बहादुरशाहशी लढा सुरु झाला. हुमायून गुजरातमध्ये लढण्यात गुतंला आहे हे पाहून शेरशहा सुरीने बिहारमध्ये सत्ता वाढविण्यास सूरुवात केली. जौनपूरच्या मोगल अधिकाऱ्यास त्याने लाच देऊन आपल्या हालचालीचा सुगावा हुमायूनास लागू दिला नाही. अल्पावधीतच शेरशहाने दक्षिण बिहारवर आपला अंमल बसवून बंगालवर शस्त्र उगारले. तेव्हा हुमायून जागा झाला. पुन्हा हुमायुनने चुनारगडाच्या प्रयत्नानंतर किल्ला हुमायूनच्या ताब्यात आला. परंतु तत्पूर्वी शेरशहाने बंगालच्या सुलतानचा पराभव करुन बंगालची राजधानी गौडवर ताबा मिळविला होता.

 

३. बंगाल विजय (इ.स. १५३८):

 

चुनारहून हुमायून बनारसला आला. या ठिकाणी शेरशहाने हुमायुनशी बोलणी चालविली. या तहान्वये हुमायुनने बिहार प्रांत आपल्याकडे घ्यावा असे ठरले. परंतु याच्या मोबदल्यात शेरशहाने १० लाख रु. वार्षिक खंडणी द्यावी असेही ठरले. परंतु याचवेळेस बंगालचा सुलतान महंमद याने हुमायुनकडे मदतीची याचना केली. त्याच्या विनंतीला मान देऊन हुमायुनने तहाची बोलणी बंद करुन बंगाल जिंकण्याचे ठरविले अल्पशा प्रतिकारानंतर हुमायून बंगालची राजधानी गौड येथे १५ ऑगस्ट १८३८ रोजी पोहचला तत्पुर्वी शेरशहा गौडमध्ये मिळविलेल्या खजिन्यासह रोहतासगड येथे सुखरूप येऊन पोहचला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे हुमायून येथे आठ महिनेपर्यंत चैन व विलासात मन रहिला. इकडे शेरशहाने बंगालमध्ये हुमायुनची संपूर्ण नाकेबंदी करुन दिल्लीशी असलेला त्याचा संबंध तोडला.

 

४. चौसाची लढाई (इ.स. १५३९) : 

 

शेरशहाने हुमायूनचे दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरले असले तरी हुमायूनचे सैन्य आडमार्गाने पूढे सरकत बिहारमधील कर्मनासा नदीजवळ चौसा या ठिकाणी तळ दिला. शेरशहास ससैन्य सर्व तयारीनिशी तेथे दाखल झाला दोन्ही फौजा एक दुसऱ्यासमोर तीन महिनेपर्यंत मुक्काम ठोकून होत्या. वेळ काढण्याकरीता त्याने हुमायूनाशी तहाच्या वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. २५ जून १५३९ रोजी शेरशहाने जाहीर केले की, शहाबाद जिल्हयातील आदिवासींचा बंदोबस्त करण्याकरिता तो जात आहे यामुळे हुमायूनचे सैन्य गाफील राहिले. परंतु त्याच दिवशी रात्रीनंतर शेरशहा परत मागे फिरला. २६ जून १५३९ रोजी सकाळी हुमायूनच्या बेसावधपणे झोपलेल्या सैन्यावर शेरशहाने अचानक तीन बाजूंनी हल्ला केला. हुमायूनच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला. सारेसैन्य पळून गेले. शेरशहाचा प्रचंड विजय झाला. एका पखालजीच्या मदतीने हुमायूनने कशीबशी गंगा नदी ओलांडली आणि स्वतःचे प्राण वाचविले. युध्दाच्या गडबडीत त्याचा जनानखान मागेच राहिला होता. शेरशहाने शाही कुटूंबातीलत सर्व स्त्रियांना सन्मानाने हूमायूनकडे आग्राला परत पाठविले. लढाईत विजयाने शेरशहाचा आत्मविश्वास अधिक वाढला.

 

५. बिलग्रामची लढाई (इ.स. १५४०) :

 

चौसाच्या पराभवानंतर हुमायून आग्र्याला आला. शेरशहाच्या वाढत्या शक्तीचा बंदोबस्त कसा करावा हा हुमायूनपूढे पेच होता. यासाठी त्याने सर्व भावांना आग्र्याला बोलविले. परंतु दुर्देवाने कोणत्याही योजनेवर त्याचे एकमत होऊ शकले नाही. कारण भावांची सहानुभूती त्यास कधीच मिळाली नव्हती सन १५४० च्या एप्रिलमध्ये हुमायून सैन्याची जमवाजमव करुन पुन्हा शेरशहाशी सामना करण्यासाठी निघाला. शेरशहाही तयारीनिशी पूढे आला. कनौज जवळील गंगा नदीच्या किनाऱ्यावर बिलग्राम या ठिकाणी दोन्ही सैन्याने समोरासमोर येऊन तळ दिला. १६ मे १५४० रोजी एकाएकी मुसळधार पाऊस पडला. मुघलांची छावणी नदीतीरावरील सखल भागात असल्याने नदीच्या पुराचे पाणी मुघलांच्या छावणीत शिरले. या संधीचा फायदा घेऊन १७ मे १५४० रोजी आफगाण सैन्याने मोगलांवर निरकाचा हल्ला चढविला. या अचानक हल्ल्यामुळे मोगल सैन्यात एकच तारांबळ उडाली. मोगलांचे सर्व सैन्य प्राण वाचविण्यासाठी पळू लागले. त्यांचा दारुण पराभव झाला. हुमायूनही आग्राकडे पळाला. आग्राहून सहकुटुंब खजिन्यासोबत दिल्ली व तेथून रोहटक, सरहिंद ओलांडून लाहोरकडे पळाला. शेरशहा लागोलाग दिल्लीवर चालून आला. हुमायूनच्या भावांनी हुमायूनला आश्रय दिला नाही. शेवटी हुमायूनला वनवास पत्कारावा लागला.

 

2. हुमायून व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०)

प्रकरण १. इ हुमायून  व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०) 


बाबरच्या मृत्युनंतर त्याचा वडील मुलगा नासिरुद्दीन महंमद हुमायून इ.स. १५३० मध्ये दिल्लीचा सम्राट झाला. गादीवर आल्यानंतर हुमायूनला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. 


१. हुमायून पुढील अडचणी : 


  • हुमायूनने आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे काबूल व पंजाब हे प्रांत कामरानला दिले. हिंदालला संबळची सुभेदारी दिली आणि मिर्झा अस्करीस मेवाडची जहागिर दिली. पूढे हे भाऊ स्वतंत्र झाल्याने हुमायूनचे मोठे नुकसान झाले काबूल व पंजाब ताब्यात न राहिल्याने तिकडून येणारे काटक व शूर सैन्य हुमायुनला मिळणे कठीण झाले. भावाच्या स्वार्थी धोरणाकडे दुर्लक्ष केले. 

  • बंगाल व बिहारमधील अफगाण सरदार पुर्वीपासुन त्याच्या विरोधात होते. हुमायुनचा कट्टर शत्रू म्हणजे महंमद लोदी त्याने सिहांसनावरील हक्क सोडलेला नव्हता. शेरशहासूर या दुसऱ्या अफगाण अमिरालाही अफगाणांचे स्वतंत्र राज्य स्थापन करावयाचे होते. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा सुध्दा अफगाणांना मदत करीत होता. 

  • आलमखानने गुजराथचा सुलतान बहादुरशाहचा आश्रय घेतला होता. बहादुरशाहने अफगाणांना पूर्णपणे पाठिंबा दिला त्यामूळे त्याचा ही बंदोबस्त करणे गरजेचे होते. संकटकाळी त्याच्या भावांनाही त्याला मदत केली नाही. म्हणून हुमायुनला बऱ्याच अडचणींनी तोंड द्यावे लागले.



२. चुनारगडचे पहिले युध्द (१५३२):


बाबरच्या मृत्यूनंतर बिहारमध्ये अफगाणांनी पुन्हा डोके वर काढले. महंमद लोदीने प्रचंड सैन्य जमवून जौनपूरवर स्वारी केली. हुमायूनने त्याचा दोहरीयाच्या लढाईत पराभव केला. या लढाईच्या दरम्यान शेरशहा सुरी नावाच्या एका अफगाण सरदाराने चूनारगडच्या किल्ल्यावर चार महिने वेढा दिला. शेवटी समेट होऊन किल्ला शेरशहाकडेच राहिला. चुनारगडसारख्या लष्करीदृष्टया महत्वाचा किल्ला शेरशहाकडे राहू देण्यात हूमायूनने मोठी चूक केली.


३. चूनारगडचे दुसरे युद्ध (१५३७):


हुमायूनचा गुजराथच्या बहादुरशाहशी लढा सुरु झाला. हुमायून गुजरातमध्ये लढण्यात गुतंला आहे हे पाहून शेरशहा सुरीने बिहारमध्ये सत्ता वाढविण्यास सूरुवात केली. जौनपूरच्या मोगल अधिकाऱ्यास त्याने लाच देऊन आपल्या हालचालीचा सुगावा हुमायूनास लागू दिला नाही. अल्पावधीतच शेरशहाने दक्षिण बिहारवर आपला अंमल बसवून बंगालवर शस्त्र उगारले. तेव्हा हुमायून जागा झाला. पुन्हा हुमायुनने चुनारगडाच्या प्रयत्नानंतर किल्ला हुमायूनच्या ताब्यात आला. परंतु तत्पूर्वी शेरशहाने बंगालच्या सुलतानचा पराभव करुन बंगालची राजधानी गौडवर ताबा मिळविला होता.


३. बंगाल विजय (इ.स. १५३८):


चुनारहून हुमायून बनारसला आला. या ठिकाणी शेरशहाने हुमायुनशी बोलणी चालविली. या तहान्वये हुमायुनने बिहार प्रांत आपल्याकडे घ्यावा असे ठरले. परंतु याच्या मोबदल्यात शेरशहाने १० लाख रु. वार्षिक खंडणी द्यावी असेही ठरले. परंतु याचवेळेस बंगालचा सुलतान महंमद याने हुमायुनकडे मदतीची याचना केली. त्याच्या विनंतीला मान देऊन हुमायुनने तहाची बोलणी बंद करुन बंगाल जिंकण्याचे ठरविले अल्पशा प्रतिकारानंतर हुमायून बंगालची राजधानी गौड येथे १५ ऑगस्ट १८३८ रोजी पोहचला तत्पुर्वी शेरशहा गौडमध्ये मिळविलेल्या खजिन्यासह रोहतासगड येथे सुखरूप येऊन पोहचला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे हुमायून येथे आठ महिनेपर्यंत चैन व विलासात मन रहिला. इकडे शेरशहाने बंगालमध्ये हुमायुनची संपूर्ण नाकेबंदी करुन दिल्लीशी असलेला त्याचा संबंध तोडला.


४. चौसाची लढाई (इ.स. १५३९) : 


शेरशहाने हुमायूनचे दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरले असले तरी हुमायूनचे सैन्य आडमार्गाने पूढे सरकत बिहारमधील कर्मनासा नदीजवळ चौसा या ठिकाणी तळ दिला. शेरशहास ससैन्य सर्व तयारीनिशी तेथे दाखल झाला दोन्ही फौजा एक दुसऱ्यासमोर तीन महिनेपर्यंत मुक्काम ठोकून होत्या. वेळ काढण्याकरीता त्याने हुमायूनाशी तहाच्या वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. २५ जून १५३९ रोजी शेरशहाने जाहीर केले की, शहाबाद जिल्हयातील आदिवासींचा बंदोबस्त करण्याकरिता तो जात आहे यामुळे हुमायूनचे सैन्य गाफील राहिले. परंतु त्याच दिवशी रात्रीनंतर शेरशहा परत मागे फिरला. २६ जून १५३९ रोजी सकाळी हुमायूनच्या बेसावधपणे झोपलेल्या सैन्यावर शेरशहाने अचानक तीन बाजूंनी हल्ला केला. हुमायूनच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला. सारेसैन्य पळून गेले. शेरशहाचा प्रचंड विजय झाला. एका पखालजीच्या मदतीने हुमायूनने कशीबशी गंगा नदी ओलांडली आणि स्वतःचे प्राण वाचविले. युध्दाच्या गडबडीत त्याचा जनानखान मागेच राहिला होता. शेरशहाने शाही कुटूंबातीलत सर्व स्त्रियांना सन्मानाने हूमायूनकडे आग्राला परत पाठविले. लढाईत विजयाने शेरशहाचा आत्मविश्वास अधिक वाढला.


५. बिलग्रामची लढाई (इ.स. १५४०) :


चौसाच्या पराभवानंतर हुमायून आग्र्याला आला. शेरशहाच्या वाढत्या शक्तीचा बंदोबस्त कसा करावा हा हुमायूनपूढे पेच होता. यासाठी त्याने सर्व भावांना आग्र्याला बोलविले. परंतु दुर्देवाने कोणत्याही योजनेवर त्याचे एकमत होऊ शकले नाही. कारण भावांची सहानुभूती त्यास कधीच मिळाली नव्हती सन १५४० च्या एप्रिलमध्ये हुमायून सैन्याची जमवाजमव करुन पुन्हा शेरशहाशी सामना करण्यासाठी निघाला. शेरशहाही तयारीनिशी पूढे आला. कनौज जवळील गंगा नदीच्या किनाऱ्यावर बिलग्राम या ठिकाणी दोन्ही सैन्याने समोरासमोर येऊन तळ दिला. १६ मे १५४० रोजी एकाएकी मुसळधार पाऊस पडला. मुघलांची छावणी नदीतीरावरील सखल भागात असल्याने नदीच्या पुराचे पाणी मुघलांच्या छावणीत शिरले. या संधीचा फायदा घेऊन १७ मे १५४० रोजी आफगाण सैन्याने मोगलांवर निरकाचा हल्ला चढविला. या अचानक हल्ल्यामुळे मोगल सैन्यात एकच तारांबळ उडाली. मोगलांचे सर्व सैन्य प्राण वाचविण्यासाठी पळू लागले. त्यांचा दारुण पराभव झाला. हुमायूनही आग्राकडे पळाला. आग्राहून सहकुटुंब खजिन्यासोबत दिल्ली व तेथून रोहटक, सरहिंद ओलांडून लाहोरकडे पळाला. शेरशहा लागोलाग दिल्लीवर चालून आला. हुमायूनच्या भावांनी हुमायूनला आश्रय दिला नाही. शेवटी हुमायूनला वनवास पत्कारावा लागला.


Monday, 1 August 2022

1. बाबर - मोगल साम्राज्याचा संस्थापक (१५२६-१५३०)

 (ब) बाबर - मोगल साम्राज्याचा संस्थापक (१५२६-१५३०)


लोदी घराण्याचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी बाबर बरोबर झालेल्या पानिपतच्या पहिल्या युध्दात ठार झाला. त्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. ही नवीन मोगल राजवट भारतात सुमारे दोनशे वर्ष प्रभावी ठरली. या राजवटीने पूर्वीचे सुलतान काळातील धार्मीक धोरण बदलून धर्म व राजकारण यामध्ये फरक केला. त्यामुळेच सर्वसाधारण भारतीयांनी मोगल राजवटीस सुलतानशाहीप्रमाणे परकीय मानले नाही. दिल्ली सत्तेशी सतत विरोधात असलेले राजपूत आता मोगल साम्राज्य स्थापनेसाठी रक्त सांडताना दिसून येतात. म्हणून संपूर्ण भारतात मोगलांना साम्राज्यविस्तार मोठया प्रमाणात करता आला. परंतू हेच राजपूत औरंगजेबाच्या धर्माविरोधात गेले तेव्हा मोगलसाम्राज्याचे पतन अपरिहार्य ठरले.


1. भारतात येण्यापूर्वी बाबर : 


जहिरुद्दिन महंमद बाबर हा भारतीय इतिहासाचा मोगल वंशाचा संस्थापक व महान साम्राज्यनिर्माता म्हणून प्रसिध्द आहे. बाबरचा जन्म सन १४८३ मध्ये फरगणा प्रातांत झाला त्याचे वडील उमरशेख मिर्झा हा फरगणाचा राजा होता. मातापित्याकंडून बाबर आपला संबंध चंगेझखान आणि तैमुरलंग या मध्य आशियातील दोन सुप्रसिध्द विजेत्यांशी लावीत असे. बाबर वडिलांच्या मृत्युनंतर फरगणा प्रातांचा राजा झाला. परंतु राज्याच्या संरक्षणासाठी त्याला आपल्या नातेवाईकांबरोबर युध्दे करावी लागली. तो महत्वाकांक्षी असल्याने त्याला मोठे साम्राज्य स्थापन करावयाचे होते. त्यासाठी समरकंदरचे राज्य मिळविण्याचा त्याने तीन वेळा प्रयत्न केला पण त्यात त्याला अपयश आले नंतर विशेष लढा न देता काबूल बाबरच्या ताब्यात आले आणि गझनी येथे राज्य स्थापन केले. यानंतर बाबरने आपली दृष्टी भारताकडे वळविली. भारतावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्याने काबूल वरुन भारतावर इ.स. १५९९ ते १५२५ या दरम्यान एकूण पाच मोहिमा काढल्या त्यातील पाचव्या आणि अंतीम मोहिमेची परिणीती पानिपतच्या पहिल्या युध्दात झाली.


2.  पानिपतची पहिली लढाई (२१ एप्रिल १५२६)


भारतात या काळात एकछत्री राज्य नव्हते. लहान लहान अनेक राज्ये होती. दिल्ली येथे इब्राहिम लोदी राज्य करीत होता. दौलतखानच्या पुत्रास सुलतानाने क्रूरपणाने वागविल्यामूळे त्याने पंजाबात आपले स्वातंत्र्य पुकारले. इब्राहिम लोदीला पदच्युत करण्यासाठी त्याने बाबरची मदत मागितली या संधीचा फायदा घेऊन बाबर पंजाबात पुन्हा आला. त्याला गुजरातचा सुभेदार इब्राहिम लोदीचा काका आलमखानही येऊन मिळाला. दौलतखानशी वितुष्ट आल्याने बाबरने प्रथम दौलतखानचा पराभव केला. पूढे बाबरच्या कैदेतच तो मरण पावला. अशा प्रकारे संपूर्ण पंजाब प्रांत बाबरच्या ताब्यात आल्यानंतर मोर्चा दिल्लीकडे वळविला.


पंजाबातील घटनांची हकीकत सुलतान इब्राहिम लोदीला समजताच पंजाबची प्राप्ती व बाबरची प्रगती रोखण्यासाठी तोही आपले एक लाख सैन्य घेऊन दिल्लीहून निघाला. उभय पक्षाच्या सैन्याची गाठ पानिपतच्या ऐतिहासिक युध्दमैदानावर झाली. बाबर आणि इब्राहिम या दोघांचे सैन्य एकमेकांसमोर आठ दिवस पावेतो तळ देऊन पडली होती. २१ एप्रिल १५२६ रोजी इब्राहिमचे शाही सैन्य पूढे सरसावले बाबरने डावपेचाने आपल्या सैन्याची निमुळती रचना करुन शत्रूंच्या सैन्यात मुसंडी मारली. त्याचबरोबर शत्रुच्या सैन्याची फळी फुटली आणि सर्वच गोंधळ निर्माण झाला. बाबरने लागलीच आपल्या तुलुगामा पध्दतीचा अवलंबन करुन बरोबर आणलेला तोफखाना शत्रूवर डागला. विस्कळीत झालेल्या इब्राहिमच्या सैन्याचे धैर्य सुटले. बाबरच्या सैन्याने याचा फायदा घेऊन दिल्लीच्या सैन्याची कत्तल सुरु केली. त्यात इब्राहिम ठार झाला. सर्वशक्तीमान ईश्वराच्या अपार कृपेने या युध्दात आम्हाला विजय मिळाला असा उल्लेख बाबरने केला आहे.

या पहिल्या पानिपतच्या लढाईचे महत्त्व म्हणजे या लढाईने दिल्लीवरील लोदीची सत्ता संपुष्टात आली आणि तिथे मोगल घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. पानिपतच्या विजयानंतर बाबरने दिल्ली व आग्रा ही शहरे काबीज केली. स्वतःला बादशहा अशी पदवी धारण केली.


3. खानुवाची लढाई (१६ मार्च १५२७): राजपुतांच्या विरुद्ध


..राजपुतांचा पूर्ण पराभव केल्याशिवाय मोगल साम्राज्य भारतात टिकणे अशक्य आहे याबाबत बाबरला पूर्ण जाणीव होती. बाबरने दिल्लीस आपले राज्य स्थापन केले हे राजपूतांना आवडले नाही. मेवाडचा राणासंग याला दिल्ली येथे आपली सत्ता स्थापन करावयाची होती. बाबर तैमुरलंगाप्रमाणे लूट घेऊन पुन्हा परत जाईल व दिल्ली आपल्याला घेता येईल अशी राणासंगाची कल्पना होती. परंतु ती चुकीची ठरली. बाबर कायमचा भारतात राहाणार असे कळल्यानंतर त्याची घोर निराशा झाली होती. राणासंगाने आता बाबरला भारताबाहेर घालवून देण्याची निश्चय केला. राजपूतांमध्ये राणासंगाला फार मान होता आणि त्याने हाक देताच राजस्थानमधील सर्व राजे त्याच्या ध्वजासाली एकत्र आले. राणासंग आणि बाबर यांच्या सैन्याची गाठ फत्तेपूर शिक्रीपासून १० मैलावर खानुवा या ठिकाणी झाली. बाबरचा राजपूतांबरोबर लढण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. तरी त्याने न डगमगता आपले सैन्य जमा केले. तोफखाना सज्ज केला. १६ मार्च १५२७ रोजी दोघे सैन्यामध्ये मोठी लढाई झाली. बाबरने आपल्या युध्द कौशल्यावर विजय मिळविला. या लढाईच्या वेळी सैन्याला उत्साह निर्माण होण्यासाठी जे आवेशयुक्त भाषण केले त्याचा चांगला परिणाम झाला. बाबर विजयी झाला आणि राणासंगाचा पराभव होऊन तो लढाईत जखमी झाला. त्याच्या सैनिकांनी त्याला उचलून रणक्षेत्राबाहेर पाहोचविले.


खानुवाचे युध्द हे अत्यंत महत्वपूर्ण समजले जाते. शेवटपर्यंत या लढाईत विजयी कोण होतो याचा निर्णय लागत नव्हता इतक्या अटीतटीची ही लढाई झाली. लढाई फक्त दहा तास झाली परंतु तिचे परिणाम दूरवर झाले. परकीय शत्रूला भारताबाहेर घालविण्याचा राजपूतांचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी झाला. भारतात बाबरने स्थापन केलेले मोगल साम्राज्य स्थिर झाले. बाबरच्या दृष्टीने खानुवाचा विजय पानिपतपेक्षा महत्वाचा होता. या विजयामुळे बाबरची एक धाडसी आक्रमक ही भूमिका संपून मोगल राज्य संस्थापक म्हणून त्याच्या आयुष्यात सुरूवात झाली. सत्तेचा केंद्रबिंदू आजपर्यंत काबूलमध्ये होते ते आता कायमचे भारतात आले.


4. घाघराचे युध्द (६ मे १५२९) : पठानांच्या विरुद्ध 


खानुवाच्या विजयाने बाबरचे आसन स्थिर झाले. राजपूतांचा जरी बंदोबस्त झाला तरी अद्याप अफगाणांचा विरोध मोडून काढावयाचा होता. इब्राहिम लोदीचा भाऊ महंमद लोदी याने बिहार मध्ये आपली सत्ता स्थापन केली. बाबरविरुध्द लढण्याकरिता एक लाख सैन्य उभारले होते. बाबरास त्याच्या हालचाली कळताच तो ससैन्य अफगाणांचा पारिपत्यास निघाला. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा पण महंमद लोदीच्या मदतीस आला होता. ६ मे १५२९ रोजी बाबराने अफगाण व नुसरतशहा यांच्या संयुक्त सैन्याचा घाघरा येथील लढाईत पराभव केला. या युध्दाने अफगाणांची दिल्लीचे राज्य जिंकण्याची आशा धुळीला मिळाली आणि बिहारचा प्रदेश मोगलांच्या अंमलाखाली आला. युध्दानंतर नुसरतशहा आणि बाबर यांच्यात आता तह झाला या तहान्वये बंगालच्या स्वातंत्र्याला धक्का लावू नये आणि नुसरतशहाने बाबरच्या शत्रूला आश्रय देवू नये असे ठरले.


5. बाबरांचा मृत्यू व योग्यता : 


भारतात पाच वर्षाच्या कालावधीत बाबराने पानिपत, खानवा व घाघरा या लढाया जिंकून मोगलांचे राज्य सिंधूपासून बिहारपर्यंत प्रस्थापित झाले. या एकसारख्या दगदगीमुळे तो आजारी पडला. वयाच्या ४८ व्या वर्षी तो २६ डिंसेबर १५३० रोजी मृत्यु पावला. समकालीन आणि आधूनिक इतिहासकारांनी एकमुखाने बाबरास मध्यकाळातील आशियाचा अत्यंत प्रभावशाली सम्राट मान्य केले आहे. भारतात तोफखाना व दारुगोळ्याचा प्रयोग करणारा तो पहिला मूसलमान शासक होता. बाबर कडवा मुसलामान होता. हिंदूना तो काफीर समजत असे तर अफगांणावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. आयोध्या, मथुरा व चंदेरी येथील अनेक मंदिरे त्याने जमीनदोस्त केली होती. इतकेच नव्हे तर मथूथुरा व आयोध्या येथे त्याने कृष्ण व राम यांच्या जन्मस्थानी मशिदी उभारल्या बाबरच्या अकाली निधनामुळे त्याला योग्य राज्यव्यवस्था बसवता आली नाही म्हणून पूढे हुमायूनला त्रास झाला बाबर विद्या व कलांचा भोक्ता होता. त्याने आपले आत्मचरित्र तुर्की भाषेत बाबरनामा किंवा तुझुक ए बाबरी लिहिलेले आहे.


Sunday, 31 July 2022

सातवाहन घराणे- गौतमीपुत्र सातकर्णी

D सातवाहन घराणे (Satvahan Period)
 
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात शुंग, कण्व, कुशाण घराण्यांचा उदय झाला तर दक्षिण भारतात ‘सातवाहन’ किंवा ‘आंध्र’ घराण्याचा उदय झाला. सातवाहन घराण्याची सत्ता इ. स. पु. २३० ते इ. स. २३० अशी जवळजवळ ४५० वर्षे द. भारतात होती. हे घराणे महत्वाचे होते कारण -
i. हे महाराष्ट्रातील पहिले महत्वाचे घराणे होते.
ii. हे महाराष्ट्रातील पहिले राज्य निर्माते होते.
iii. यांच्या काळात मराठी भाषा, मराठी संस्कृती याला आकार यायला सुरुवात झाली.
१. सातवाहन मुळचे कोण?
सातवाहन मुळचे कोण याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहे. सातवाहनांची दोन नावे साधनांमध्ये येतात. अ. आंध्र किंवा आंध्रभृत्य ब. सातवाहन त्याचा अर्थ खालीलप्रमाणे सांगता येईल.
अ. ‘आंध्र किंवा आन्ध्रभृत्य’ :
पुराणामध्ये सातवाहनांचा उल्लेख ‘आंध्र’ किंवा ‘आंध्राभृत्य’ असा येतो. त्याचा अर्थ,
i. प्राचीन काळात ‘आंध्र’ नावाची जमात होती तीच पुढे राज्यकर्ते सातवाहन झाले
ii.किंवा आन्ध्र राजांचे सातवाहन सेवक असावेत किंवा
iii.सातवाहन राजांचे चे आंध्र सेवक असावेत.
iv.काही इतिहासकार म्हणतात कि, सातवाहन मुळचे आंध्रप्रदेशातील असावेत. नंतर ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले असावेत. पण सातवाहनांचे सुरुवातीचे शिलालेख महाराष्ट्रात सापडतात त्यामुळे सातावाहानाचे मुळ स्थान महाराष्ट्रातील असावे.
३. सातवाहन काळातील राजकीय जीवन : थोडक्यात :
ब. सातवाहन :
काही इतिहासकारांच्या मते, i. सातवाहन सूर्याचे उपासक होते, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. त्यामुळे या सुर्योपासक घराण्याला ‘सातवाहन’ असे नाव पडले असावे.
ii. सातवाहनांच्या मुळ पुरुषाचे नाव सातवाहन होते. त्यामुळे या घराण्याचे नाव सातवाहन पडले.
वरील चर्चेवरून हे स्पष्ट होते कि, सातवाहन हे मूळ महाराष्ट्रातील होते. प्रतिष्ठान(पैठण) ही सातवाहनांची दीर्घकाळ राजधानी होती.
 
२. सातवाहनांचा पहिला राजा : सिमुक-
सिमुक (शिमुक,शिन्धुक) हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहनाच्या उदय काळात त्यांना शकांच्या आक्रमणाचा सामना करावा लागला. त्यांनी सातवाहनाना पराभूत करून महाराष्ट्रात वर्चस्व मिळवले. सातवाहन घराण्यात अनेक राजे होऊन गेले. मात्र या सर्वात गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वात पराक्रमी राजा होऊन गेला.
 
३. गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स. १०६-१३०):
सातवाहन घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी होता. त्याने आपल्या अंगभूत पराक्रमाने सातवाहन राज्याचा विस्तार केला. गौतमीपुत्राच्या काळात सातवाहन राज्य तत्कालीन भारतातील एक प्रभावशाली राज्य बनले. गौतमीपुत्र सत्तेवर आला त्यावेळी सातवाहनांचा बराचसा भूभाग शक राजांनी जिंकला होता. तेंव्हा गौतमीपुत्रासमोर शक हेच प्रमुख आव्हान होते. त्याने प्रथम शकांशी युद्ध केले.
 
i.शकांचा पराभव :
गौतमिपुत्राने शक जमातीच्या क्षहारात घराण्याचा पराभव केला. पराभूत क्षहरात राजा नहपान याची ८००० चांदीची नाणी सापडली आहेत. या नाण्यावर गौतमीपुत्राची मुद्रा पुन्हा उमटवली आहे. यावरून गौतमिपुत्राने शकांचा पराभव केला हे स्पष्ट होते.
ii.माळवा जिंकला:
शकांचा पराभव केल्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याने माळवा(आजचा मध्य प्रदेश) जिंकला. त्यामुळे सातवाहन राज्याचा विस्तार मध्य भारतातही झाला.
iii. शक-यवन-पहलव-निशुदन :
गौतमीपुत्राच्या शिलालेखात त्याने ही पदवी घेतली आहे. त्याचा अर्थ शक, यवन म्हणजे ग्रीक आणि पल्लव यांचा पराभव करणारा असा होतो.
iv. त्रिसमुद्रतोयपितवाहन :
नाशिक येथे एक शिलालेख गौतमिपुत्राच्या आईने कोरला आहे. त्यात तिने ही पदवी आपल्या मुलासाठी कोरली आहे. त्याचा अर्थ ज्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत तो, असा होतो. म्हणजे त्याची सत्ता तीन समुद्राच्या मधल्या भागात म्हणजे दक्षिणापथात चालत असावी.
 
४. वाशिष्टीपुत्र पुलुयामी :
                               गौतमीपुत्र सातकर्णी नंतर वाशिष्टीपुत्र सत्तेवर आला. त्याची नाणी आंध्र प्रदेशात सापडल्याने त्याचे आंध्र भागावर वर्चस्व होते. हे स्पष्ट होते. त्याच्या काळात शक-सातवाहन संघर्ष पुन्हा उफाळून आला. शक राजा रुद्रदामन पहिला याने सातवाहनांचा दोनदा पराभव केला. परंतू सातवाहनांशी विवाहसंबध असल्याने त्यांचे राज्य नष्ट केले नाही.
 
५. यज्ञश्री सातकर्णी : 
या राज्यकर्त्याने शकांडून कोकण, माळवा हे प्रदेश जिंकून घेतले. त्याला समुद्र संचार व व्यापारात रस होता. त्याच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाच्या प्रतिमा आहेत. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. यज्ञश्री नंतर सातवाहन सत्तेला उतरती कळा लागली. इ.स. तिसऱ्या शतकात सातवाहन सत्तेला साम्राज्याचा ऱ्हास झाला.


Monday, 21 February 2022

शिवाजी महाराजांचे मानवतावादी तत्त्वज्ञान- श्रीमंत कोकाटे

 


Feb 19, 2022

 

छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचे लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. प्रसंगी जीवघेणा संघर्ष केला. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली; परंतु ते हतबल झाले नाहीत. संकटसमयी ते लढणारे होते; रडणारे नव्हते. त्यांनी हाती शस्त्र घेऊन स्वराज्याच्या शत्रूंना धडा शिकविला. त्यांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याविरुद्ध लढा दिला; पण तो लढा राजकीय होता, धार्मिक नव्हता. याउलट त्यांचे कार्य सर्व धर्मांतील प्रजेच्या हिताचे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. याचे अनेक संदर्भ शिवचरित्रात अनेक ठिकाणी आहेत. शिवाजीराजांच्या काळात अनेक जाती होत्या, अनेक धर्म होते; परंतु धर्मांधता आणि जातीय विद्वेषाला त्यांनी पायबंद घातला. त्यांचे विचार आणि कार्य सकल मानवजातीच्या कल्याणाचे होते. याबाबत समकालीन गोव्याचा पोर्तुगीज व्हॉइसरॉय त्याच्या देशातील राजाला जानेवारी १६७०मध्ये पाठविलेल्या पत्रात पुढीलप्रमाणे कळवितो, ‘शिवाजीमहाराज हे प्रबळ राजे आहेत. त्यांची प्रजा त्यांच्यासारखीच मूर्तिपूजक असली, तरी ते सर्व धर्मांना नांदू देतात. या भागातील (भारतातील) अत्यंत धोरणी व राजकारणी (मुत्सद्दी) पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे.’ पोर्तुगीज व्हॉइसरॉयच्या पत्रावरून स्पष्ट होते, की छत्रपती शिवाजीमहाराज व त्यांची प्रजा मूर्तिपूजक असली, तरी मूर्तिपूजा न करणाऱ्यांच्या धार्मिक अधिकारावर त्यांनी अतिक्रमण केले नाही. याचा अर्थ त्यांनी बहुसांस्कृतिक मानसिकतेचा आदर केला. आपल्या धार्मिक श्रद्धा त्यांनी परधर्मियांवर लादल्या नाहीत किंवा त्यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार त्यांनी हिरावून घेतला नाही. यावरून स्पष्ट होते, की मध्ययुगीन काळातील ते सर्वांत प्रगल्भ राजे आहेत. इतर धर्मियांनी आपल्या धर्माला अनुकूलच वर्तन केले पाहिजे हा आततायीपणा त्यांच्या ध्येयधोरणात नव्हता. प्रागतिक विचारांबरोबरच अनेक धर्मियांच्या धार्मिक श्रद्धा जोपासायला हव्यात ही अत्युच्च विचारधारा शिवरायांची होती.

लोककल्याणकारी प्रशासन

छत्रपती शिवाजीमहाराज दक्षिण दिग्विजयासाठी तमिळनाडूत होते; तेथील प्रदेश त्यांनी जिंकून घेतल्यानंतर तिरूवाडी येथे असताना डच व्यापारी काही सवलती मागून व्यापारी करार करण्यासाठी शिवाजीराजांकडे आले. तेव्हा शिवाजीराजांनी डचांबरोबर केलेल्या व्यापारी करारात एक कलम आवर्जून घातले. ते पुढीलप्रमाणे, ‘‘इतर कारकिर्दीत (हा भाग जिंकून घेण्यापूर्वी) तुम्हाला स्त्री-पुरुष यांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची अनिर्बंध परवानगी होती; परंतु माझ्या राज्यात स्त्री-पुरुष यांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची परवानगी मिळणार नाही असे काही करण्याचा प्रयत्न कराल, तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.’ ज्या मध्ययुगीन काळात जगभर स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री केली जात होती, त्या काळात शिवाजीमहाराजांच्या राज्यात स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री केली जात नव्हती. युरोपसारख्या पुढारलेल्या खंडातदेखील मध्ययुगीन काळात गुलामगिरी होती. त्या काळात शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यात गुलामीची प्रथा नव्हती. औद्योगिक क्रांतीत युरोप आघाडीवर होता; परंतु मानवतावादी धोरणात शिवाजीराजांचे स्वराज्य आघाडीवर होते याचा हा भक्कम पुरावा आहे. राज्य, राजकारण, राज्यकारभार, शासन आणि प्रशासन हे लोककल्याणकारी असले पाहिजे हा शिवाजीमहाराजांचा आग्रह होता, हे डच व्यापारी करारावरून स्पष्ट होते. ढाल-तलवारीच्या गदारोळात मानवता वृद्धिंगत झाली पाहिजे हे शिवाजीमहाराजांचे धोरण होते.

बहुसांस्कृतिक समाजव्यवस्था

पुण्याजवळील उरुळी आणि फुरसुंगी येथील मशिदीच्या व्यवस्थापनात मोकदम चांदखान ढवळाढवळ करत असल्याचे शिवरायांना समजले तेव्हा शिवाजीराजांनी त्याला समज दिली, ‘‘ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायला हवा.’’ बहुसांस्कृतिक समाजव्यवस्थेत ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये; परंतु अन्याय-अत्याचार करणारे आततायी कृत्य शिवाजीराजांनी खपवून घेतले नाही. शिवाजीराजांनी लोककल्याणासाठी हाती तलवार घेतली. ती त्या काळाची गरज होती. त्यांनी अफजलखान, शाईस्तेखान यांचा बंदोबस्त केला; परंतु जखमी सैनिकांना औषधोपचार केला. अगदी शत्रूपक्षातील जखमी सैनिकांनादेखील त्यांनी जीवदान दिले. अफजलखानाला ठार मारल्यानंतर शिवाजीराजांनी पुढे काय केले याचे वर्णन समकालीन कृष्णाजी अनंत सभासद पुढीलप्रमाणे करतात, ‘‘मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यांस धरून आणिले. राजा खासा प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफजलखानाचे लोक व त्यांचे पुत्र भांडते माणूस होते तितकियांस भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लेकांस चालविले.’’ शिवाजीराजांनी दुष्ट अफजलखानाला मारले; परंतु त्याच्या मुलास अभय देऊन प्रेमाने वागविले, असे समकालीन सभासद सांगतात. त्यांचे धोरण मानवतावादी होते.

प्रजाहित रक्षक

शेतकऱ्यांच्या एका काडीचीदेखील तसनस (नासधूस) न व्हावी,’ अशी शिवाजीराजांची आज्ञा होती. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचे रक्षण झाले पाहिजे या त्यांच्या सक्त सूचना होत्या. शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले, ‘संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा पेटलेली वात उंदीर घेऊन जाईल व त्यामुळे जनावरांचा चारा, पीक जळून खाक होईल. स्वयंपाकघरातील विस्तव विझवून झोपा अन्यथा चारा नष्ट झाल्यावर शेतकऱ्यांचे पीक, फांदी, लाकूडफाटा आणाल, हे तर मोगलांपेक्षा जास्त जुलूम केल्यासारखे होईल.’’ आई ज्या पद्धतीने मुलांची काळजी घेते त्याप्रमाणे शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.

·        


दुष्काळाप्रसंगी शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले, ‘बैलजोडी दगावली असेल, तर शेतकऱ्यांना बैलजोडी द्या. खंडी-दोन खंडी धान्य द्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल. वाढीदिडीने वसूल करू नका. मुद्दलच तेवढी घ्या.’ शिवाजीराजे संकटसमयी श्रमकरी, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी रयतेला शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. गरिबांचे संसार उद्‌ध्वस्त करणाऱ्या व्याज पद्धतीला त्यांनी आळा घातला. ते मानवतावादी होते, हे त्यातून स्पष्ट होते. म्हणून शिवकाळात अत्याधुनिकता नसली तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. सर्जेराव जेधे यांना पाठविलेल्या पत्रात शिवाजीराजे म्हणतात, ‘‘तुमच्या इलाख्यात मोगलांची फौज येत आहे. हयगय न करता रयतेला लेकराबाळासह सुरक्षितस्थळी पाठवा. हयगय कराल, तर तुमच्या मस्तकी रयतेचे पाप बसेल.’’ संकटसमयी रयतेला मदत करणे हेच खरे पुण्य आहे, संकटसमयी रयतेला वाऱ्यावर सोडून देणे हे पाप आहे. अशी शिवाजीराजांची पापपुण्याची संकल्पना होती.

मानवतावादी धोरण

स्त्रियांचा आदर-सन्मान केला पाहिजे. शत्रूची असली तरी तिचा आदर-सन्मान करावा, ही शिवाजीराजांची राजनीती होती. शिवाजीराजांच्या या नैतिकतेचे वर्णन खाफीखानासारख्या समकालीन मोगल इतिहासकारांनीदेखील केलेले आहे. शिवाजीराजांनी रणांगण गाजविले. अनेक शत्रूंचा बंदोबस्त केला; परंतु लोककल्याणकारी, मानवतावादी धोरण त्यांनी कधीही सोडले नाही. त्यामुळेच समकालीन कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, ‘‘एवढा मराठा पातशहा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.’’ शिवाजीराजांचे कार्य कर्तृत्व, जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि राष्ट्राच्या सीमा ओलांडून वैश्‍विक दर्जाचे आहे. त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे.

 

Wednesday, 5 January 2022

भीमा कोरेगाव स्तंभाच्या स्मृतींचा इतिहास- डॉ श्रद्धा कुंभोजकर

भीमा कोरेगाव मधील जयस्तंभ आणि त्याभोवती असणारे स्पर्धक स्मृतींचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या निबंधात केला होता. मूळ निबंध २०१२ मध्ये ईकनॉमिक एन्ड पोलिटिकल वीकली मध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्यात सुधारणा करून केलेला अनुवाद परिवर्तनाचा वाटसरू आणि ऐसी अक्षरे वर २०१८ मध्ये प्रकाशित झाला होता. लेख वाचण्यासाठी इथे clik करा वा 

डॉ श्रद्धा कुंभोजकर

Wednesday, 14 July 2021

4.2 करोड इंग्रजी इ पुस्तके

 4.6 कोटी इंग्रजी अभ्यासाची पुस्तके। सर्व विषयांची।मोफत। राष्ट्रीय डीजीटल वाचनालय । खालील लिंक ओपन करा


https://historydepartmentsardacollege.blogspot.com/p/46-national-digital-library.html

Thursday, 1 July 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सने भरवले ऑनलाइन प्रदर्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मध्ये शिकले, त्या संस्थेनं त्यांची आठवण जागवण्यासाठी हे ऑनलाइन प्रदर्शन तयार केलंय. त्यांनी भरलेल्या प्रवेश अर्जापासून पुढे अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज यात पाहता येतात. आवर्जून पहावे असं प्रदर्शन. 
https://www.lse.ac.uk/library/whats-on/exhibitions

Tuesday, 22 June 2021

स्थानिक इतिहास: पळाशी गावचे कलावैभव- भूषण देशमुख

येथे क्लिक करा
पळशीचं शिल्पवैभव
-----
वर्षासहलीचा आनंद घेण्याबरोबर अदभूत शिल्पसौंदर्याची अनुभूती घ्यायची असेल, तर एखादा रविवार पळशीसाठी राखून ठेवा. पारनेर तालुक्यातलं हे छोटसं गाव कल्याण-निर्मल या भारताच्या पूर्व आणि पश्चिमेकडील दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टाकळी ढोकेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूनं दगडी तटबंदी असलेली अशी गावं आज दुर्मिळ झाली आहेत. वेशीचे चार दरवाजे बंद केले की, पूर्वी गाव एकदम सुरक्षित बनत असे. होळकरांचे कर्तबगार दिवाण असलेल्या पळशीकरांनी हे गावं वसवलं, तिथं देखणे चारमजली भव्य वाडे उभारले. दोनशे-सव्वादोनशे वर्षांपूर्वी उत्तर पेशवाईत बांधलेल्या या वास्तू पाहिल्या, की पुण्यातला शनिवारवाडा कसा असेल, याची कल्पना येते. या वाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं असलेली काष्ठशिल्पं. सागवानी लाकडात कोरलेली अशी शिल्पं महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. हत्ती, घोडा, वानर, मासा याबरोबरच विविध प्रकारची फळं आणि फुलांची गुंफण इथं पहायला मिळते. त्यातील डाळिंब तर चक्क हलतं. साखळी इतकी नजाकतीनं कोरली आहे, की ती खरीखुरी भासावी. काही मानवी आकारही आहेत. त्यातील मूल घेतलेली महिला बघण्यासारखी आहे. केळी किंवा सुरूसारखी पानं कोरलेले बारा खांब लाजवाब. वरच्या मजल्यावर रंगमहाल आहे. त्याच्या सुबक लाकडी कमानी अजून शाबूत आहेत. मात्र, भिंतीवर काढलेली मराठा, माळवा शैलीतली चित्रं पुसली जाऊन नव्यानं कुणी आपली कला पेश केली आहे. या वाड्यातलं देवघरं आवर्जून बघायला हवं. तिथलं नक्षीकाम केलेलं लाकडी छत हल्लीच्या पीआेपीला लाजवेल असं आहे. या देवघरात ‘वासुदेव प्याला’ होता. तान्ह्या बाळकृष्णाला घेऊन यमुना आेलांडणारा वासुदेव त्यात दाखवलेला होता. या प्याल्यात पाणी अोतायचं. कृष्णाच्या पायाला पाणी लागलं, की ते अोसरतं, याचा अनुभव मी मागच्या भेटीत घेतला होता. या रविवारी ‘स्वागत अहमदनगर’ हेरिटेज वाॅकमध्ये मात्र हा वासुदेव प्याला पाहता आला नाही. मालकांनी तो नेला, असं समजलं. या वाड्याची काळजी गणेशदेवा पोळ घेतात. या वाड्याची दुरूस्ती सध्या सुरू असल्यानं आणखी काही शतकं हे वैभव आपल्याला पाहता येईल. या वास्तूजवळच असलेला वाडा आर्किटेक्ट लक्ष्मणराव पळशीकर यांनी छान जपला आहे. पूर्वजांनी दिलेलं संचित कसं जपावं, याचा आदर्श या दाम्पत्याकडून घ्यावा. 

गावाच्या वेशीबाहेर ‘धाकटी पंढरी’ म्हणून अोळखलं जाणारं पळशीकरांनी बांधलेलं विठ्ठल मंदिर आहे. राही आणि रूख्मिणीसमवेत असलेल्या या विठ्ठलाचं दर्शन घेतलं, की चहुबाजूनं फिरत तिथलं शिल्पसौैंदर्य डोळ्यांत साठवावं. चारही बाजूंना बुरूज असलेल्या तटबंदीच्या दर्शनभागी उत्तर हिंदुस्थानी शैलीतलं सुरया आणि देवतांच्या मूर्ती असलेलं प्रशस्त प्रवेशद्वार आणि शेजारी पुष्करणी आहे. नऊविध विद्यांच्या प्रतीक असलेल्या नऊ पायऱ्या चढून गेलं, की अठरा पुराणांचे प्रातिनिधीक स्वरूप असलेले अठरा खांब आणि त्याखाली असलेले विशाल दगडी कासव दिसतं. गाभाऱ्यात प्रवेश करताना रिद्धी-सिद्धी आणि ६४ योगिनी आपलं लक्ष वेधून घेतात. पांडुरंगाच्या प्रभावळीवर मत्स्य, कच्छादी दशावतार कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर आणि कळसावर असलेली शिल्पं हे इथलं खरं वैभव आहे. यातील काही शिल्प मिनीएचर म्हणावीत, इतकी आकारानं लहान आहेत. नीट निरखून पाहिलं, तरच त्यातलं सौंदर्य लक्षात येतं. मोरांचे असंख्य आकार त्यात आहेत. पोपट आहेत, कारंजी आहेत. झुंजणारे हत्ती तर अप्रतिम. झाशीच्या राणीसारखी पाठीशी मूल घेऊन घोड्यावरून लढणारी वीरांगना इथं आहे, भाल्यानं शिकार करतानाचं शिल्प आहे. नगरच्या किल्ल्यांवर आढळणारं शक्तीसामर्थ्य दाखवणारं पायाखाली हत्ती आणि वरच्या बाजूला आकारानं मोठ्या असलेल्या सिंहाचं शिल्प या मंदिराच्या कळसाच्या समोर विराजमान झालं आहे.

 केवळ छन्नी आणि हातोडी वापरून दोन शतकांपूर्वी माळवा प्रांतातून आलेल्या शिल्पकारांनी या कलाकृती घडवल्या. सुशोभीकरण म्हणून काहींवर अलिकडे अाॅईलपेंट लावण्यात आला असला, तरी तो काढून मूळ स्वरूपात हे शिल्पवैभव जपण्यात येणार असल्याचं समजलं. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन बंधाऱ्यांमुळं पळशीचं जलदुर्भिक्ष्य तर दूर झालंच आहे, शिवाय या मंदिराला सुरेख असं जलवैभव प्राप्त झालं आहे. पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवणाऱ्या आनंदराव रामराव पळशीकरांच्या घरातील दोन सतींचं स्मारक आणि मंदिरं पलिकडं आहेत. जीर्णोद्धारामुळं ही मंदिरंही नव्यानं सजली आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. सगळं वर्ष घरात बसून काढल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठी, जगण्याचा नवा अर्थ शोधण्यासाठी कुठं जायचं असेल, तर पळशी हे उत्तम ठिकाण आहे....

भूषण देशमुख
अहमदनगर
bhushandeshmukh07@gmail.com

(छायाचित्रे `स्वागत अहमदनगर हेरिटेज वाॅक`च्या सदस्यांनी काढलेली आहेत.)


Friday, 18 June 2021

साधना साप्ताहिक जुने अंक

साधना साप्ताहिक जुने अंक

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे
अहमदनगर कॉलेजच्या माजी इतिहास विभाग प्रमुख *प्रा. डॉ. वृषाली सुधीर तारे  यांचे चिरंजीव श्री. प्रसाद तारे* यांनी *छ.शिवाजी महाराजांच्या* तीन चित्रांचे संशोधन केले आहे. प्रसाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून टाटा टेक्नॉलॉजी मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
नगरच्या सुपुत्राला हार्दिक शुभेच्छा.
डॉ. वृषाली तारे मो.नं.91 90110 73115

Tuesday, 25 May 2021

शोध अजिंठ्याचा- प्रदीप आवटे यांचा लोकसत्ता मधील लेख

अजिंठ्याच्या गुंफा आणि वाघुर नदी दाखवणारे हल्लीचे छायाचित्र; भूशास्त्र-अध्यापक आणि प्रस्तरतज्ज्ञ मनोज ना. बागडे यांनी अजिंठा प्रस्तरांना असलेल्या धोक्याबाबत लिहिलेल्या विद्वन्मान्य अभ्यासनिबंधातून 

|| प्रदीप आपटे

अजिंठ्याच्या गुंफा ‘दिसल्या’, त्या निजामी आणि मराठी मुलखावर कंपनीचा पूर्ण अंमल आल्यानंतर वर्षभरात! मग पुढली सुमारे ३५ वर्षे या अद्भुत लेण्यांचा अभ्यासच ब्रिटिशांकडून- अधूनमधून सुरू होता. लेण्यांचे जतन व्हावे, ही भावना मूळ धरू लागली होती…

सन १८१९. जेम्स स्मिथ, निजामशाही भागातला मद्रास रेजिमेंटचा एक ब्रिटिश सैन्याधिकारी. वाघुर नदीकाठाने वाघाचा शिकारी पाठलाग करीत चालला होता. वाघ हुलकावणी देत दिसेनासा झाला. नीट नजरेस पडत नव्हता. त्याच्या कानावर एका स्थानिक पोऱ्याचा आवाज आला. तो पोरगा त्याला वाघ कुठे असेल याची चाहूल सांगत होता. तेवढेच साहेबाकडून बक्षिसी मिळेल या आशेने! पोरगा खुणावत होता त्या दिशेने स्मिथने नजर टाकली. नदीकाठाला लगटून उंचीवर अर्धगोल डोंगर पसरला होता. स्मिथने नीट न्याहाळलं. तर त्याच्या नजरेस सोनेरी पिवळसर आणि लाल डाग दिसला तोही खांबाच्या आड आणि मधोमध! स्मिथच्या लक्षात आले इथे काही तरी प्राचीन वास्तू आहे. त्याचे डोळे लकाकले. त्याने दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांतले लोक हाताशी घेतले. झाडझाडोरा, काटेकुटे निवारत त्या कड्याच्या दिशेने वाट धरली. नदीच्या वरच्या बाजूला घोड्याच्या नालासारखा अर्धगोल कडा होता. आणि त्या कड्याची रांग धरून काही गुंफा होत्या. एका गुंफेत त्याने पाऊल टाकले. आणि पलित्याच्या प्रकाशात पाहिले. समोर काय नजरेस पडणार असे काहीच स्मिथच्या ध्यानीमनी नव्हते. नजरेस पडला भिंतीवरचा सात्त्विक तेजाचा एक चेहरा… या अचानक बुद्धदर्शनाने स्मिथ भांबावला. या एकाएकी लाभलेल्या साक्षात्कारी लाभाने तो हुरळून गेला. आनंदाच्या भरात त्याने नको तो मूर्ख उन्माद केला. तिथल्या भित्तिचित्रावर आपले नाव कोरून टाकले!

स्मिथला जे गवसले त्याचा पुरेसा बोलबाला झालाच. त्यानंतर १८२४ साली स्कॉटलंडमधील सर जेम्स अलेक्झांडर हा लष्करी अधिकारी या गुंफा बघण्यासाठी अजिंठ्याला भेट द्यायला आला. या गुंफांबद्दल अधिक सविस्तर वर्णन त्याने लिहिले. (ट्रान्झॅक्शन्स ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट बिटन अँड आयर्लंड (१८२९) मध्ये हे प्रसिद्ध झाले आहे.) त्याने सर्वच्या सर्व गुंफा पूर्णतया निरखलेल्या नव्हत्या. जे जे डोळा भरून पाहिले आणि रेखाटून घेता आले त्यावरचे हे छोटेखानी, नऊ-दहा पानांचे टिपण आहे. तिथले कडुनिंब, मोह आणि बाभळी वृक्ष, विस्कट माजलेली गवते आणि झुडपांनी बुजबुजले रान, त्या खोऱ्यात जमेल तशी क्रूर वाटमारी करणारे भिल्ल, श्वापदांचे भय आणि या सगळ्याला न जुमानता अलेक्झांडरने जोडीला घेतलेली गावकरी फौज… शिकारकथा वाटावे असे वर्णन त्याने लिहिलेल्या टिपणात सुरुवातीला आहे. त्याला त्या काळात ठाऊक असलेल्या बुद्ध, जैन आणि वैदिक परंपरांचे तुलनात्मक वर्णन आहे. सयाम, ब्रह्मदेशातील बुद्ध उपासनांचे वर्णन आहे. तेथील चित्रांची त्या चित्रांतल्या मनुष्याकृती, त्यांच्या हालचाली आणि हावभाव, आसनाची ढब, अलंकार आणि त्यावरली त्याची संक्षिप्त टिप्पणी अशा सगळ्या तपशिलांनी हे टिपणात भरले आहे. उदा. चित्रांमधल्या स्त्री-पुरुषांचे कुरळे वर्तुळवृत्ती केस, त्यांच्या केशभूषा, तुलनेने ठसठशीत जाडसर ओठ यामुळे त्याला ते आफ्रिकन ठेवणीचे वाटले! प्रवेशद्वार कमानींची ठेवण कार्ले आणि कान्हेरी लेण्यांशी मिळतीजुळती आहे. नीटसे रेखाटलेले हत्ती, घोडे, त्यावरचे स्वार, टक्कर जुंपलेले मेंढे आणि कोंबड्या यांची रेखाटने. त्याला विशेष वाटले ते म्हणजे त्रिशुळी भाले! त्याने विशेष वाद्यासंबंधी निरीक्षण नोंदले आहे. ‘हे एक गाण्याच्या साथीचे वाद्य आहे आणि त्याला तीन तारा आहेत’ असे तो नोंदतो! तीनतारी वाद्य म्हणजे ‘सेह तार’! (फारसीतले सेह म्हणजे तीन! सेह अधिक तार हा सितार/ सतारचा मूळ शब्द आहे. किन्नरांच्या हातातील वाद्य आकाराने प्रचलित सरोदशी मिळतेजुळते आहे.) भित्तिचित्रांमधल्या प्रमुख रंगछटा, त्यामधील लाल रंगाचा बलवत्तरपणा असे किती तरी तपशील त्याने अधोरेखिलेले आहेत. तेथील चतुष्स्तंभी रचना, त्यावरील उभे कंगोरे, त्यांचे ग्रीक व रोमन शैलींशी असलेले साधम्र्य आणि वैधम्र्य याकडेही त्याने लक्ष वेधले आहे.

त्याने आत शिरल्यावर जे काही भव्यदिव्य पाहिले त्याने तो भारावून गेला होता. त्याने जवळचे वेरुळदेखील पाहिले होते. पण त्याला अजिंठामधील कला अधिक उच्चतर, कल्पक आणि पाहणाऱ्याला निराळी मनोवस्था प्राप्त करून देणारी वाटली. आपण बघितले ते फार निराळे उच्च दर्जाचे प्राचीन स्मारक आहे. ते आणखी नीट बघितले पाहिजे याची त्याला जाणीव होती. तो खेदाने लिहितो, ‘हाती असलेल्या वेळेमध्ये जेवढे जमेल तेवढे मी बघितले. माझी रजा जवळजवळ संपत आली आहे. येथून निघणे क्रमप्राप्त आहे, पण मला इथे पुन्हा यायलाच पाहिजे आणि मी येईनच.’

या भारावलेल्या वर्णनांबरोबरीने त्याच्या कथनामध्ये लेण्यांची विदारक अवस्थासुद्धा तितकीच ठाशीव वर्णिलेली आहे. गुंफांमध्ये वाटमारी करणाऱ्यांच्या वर्दळीच्या खुणा दिसत होत्या. या गुंफा त्यांच्या लपून दबा धरण्याच्या, तात्पुरत्या वस्तीच्या अशा जागा बनल्या होत्या. त्यांच्या विझलेल्या शेकोट्या, छताला धरलेली मधमाश्या आणि गांधीलमाश्यांची पोळी, धुळीत आणि वाळक्या चिखलात उमटलेले श्वापदांच्या पायांचे ठसे तिथे जागोजागी होते. एवढेच काय एका माणसाचा अवघा अतूट सांगाडा होता! त्यावर विशेष म्हणजे त्याचा पोर्तुगीजांवरील शेरा! तो म्हणतो, ‘पोर्तुगीजांच्या तावडीत आलेल्या अन्य धर्मीयांच्या वास्तूंची जशी वाट लागते तसे इथे अजून झालेले नाही. सुदैवाने इथल्या चित्रांवर पोर्तुगीजांचा भ्रष्ट विद्रूप करणारा हात चाललेला नाही!’ हे लिहिताना बहुधा त्याच्या मनांत घारापुरी लेण्यात पोर्तुगीज सैनिकांनी केलेला विच्छेदी पराक्रम असावा. त्यांनी आपले नावे कोरली होतीच. शिवाय नेम धरून गोळीबाराचा सराव करायला ते तिथल्या मूर्तींचा वापर करीत.

अर्थात, असे नतद्रष्टपण पोर्तुगीजांनी बुद्ध्याच केले. ख्रिस्तेतर धर्मांची प्रार्थनास्थळे, मानचिन्हे, खुणा, संस्कार पाळामुळांसह उपटून टाकण्याचे धर्मवेड हे त्यांच्या साम्राज्याचे एक अधिष्ठान होते. (शतकानुशतके आपसांत धर्मयुद्ध लढणाऱ्या कर्मठ ख्रिस्ती आणि इस्लामचा हा गुण मात्र अगदी समान होता!) पण धर्मवेड नसले तरी पुरातन वारशाच्या जपणुकीची आस्था नसणारे नतद्रष्ट काही ब्रिटिशदेखील होते. पुरातन स्थळांचा वारसा जपण्याबद्दल आपली राजवट जागरूक आहे असा कंपनी सरकारचा पवित्रा असला तरी काही अधिकारी त्याला लीलया हरताळ फासत! सर जॉन माल्कम यांच्या आज्ञेवरून सातारा गादीवरच्या रेसिडेन्टचा शल्यवैद्य डॉ. बर्ड अजिंठ्याला पाहणीसाठी गेला होता. त्याने तेथील चार चित्रांचे पापुद्रे काढून पाहिले आणि चित्रे विद्रूप झाली. त्यावर कडी म्हणजे हे लोण नंतर भेट देणाऱ्या प्रेक्षकांनीदेखील जारी ठेवले! भेट दिलेल्या या स्थळाचे स्मरणचिन्ह म्हणून घेऊन जायला ते असे तुकडे खुडायचे! पुरेशी बक्षिसी दिली की तिथे नेमलेला ‘राखणदार’च त्यांना मदत करे! काही काळानंतर राल्फ नावाच्या ब्रिटिशाने अजिंठ्याला भेट दिली तेव्हा हे विद्रूपीकरण उघडकीला आले. याबद्दलची राल्फची तक्रार आणि टिपण जेम्स प्रिन्सेपने थेट ‘जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी’मध्ये प्रसिद्ध केले. जेम्स फग्र्युसननेसुद्धा याबद्दल जोरदार आवाज उठविला. १८३९ मध्ये मद्रास लष्करामधला लेफ्टनंट ब्लेक याने अजिंठ्यावर अधिक विस्तृत वर्णन करणारा मोठा लेख ‘बॉम्बे कुरिअर’मध्ये प्रकाशित केला. १८४३ साली जेम्स फग्र्युसनने या सर्व लेण्यांची बारकाईने पाहणी केली. त्यातले वास्तुशास्त्र तपशिलाने रेखाटले. ही माहिती लिहिण्यासाठी, संकलित करून सादर करण्यासाठी त्याला सर्व लेण्यांचे नकाशे आणि क्रम नोंदणे गरजेचे होते. त्यांचा चंद्रकोरीसारखा काठावरचा क्रम धरून त्याने रस्त्यांवरच्या घरांना द्यावे तसे लेण्यांना क्रमांक देऊन टाकले (असे त्याने स्वत:च लिहिले आहे!) आणि तेच आजतागायत रूढ झाले.

अशा प्राचीन काळाच्या वारसा-स्मारकांचे जतन, संरक्षण, जपणूक ही जुनाट चिरकाळी दुखण्यासारखी समस्या आहे. काही ना काही काळाने ती डोके वर काढतेच! अगदी चार-पाच वर्षांपूर्वी धाराशिव (उस्मानाबाद) इथल्या लेण्यांची पावसाने खचून होणारी पडझड, स्थानिक गुंड आणि हौशी पर्यटक यामुळे होणारी दुर्दशा यांच्या बातम्या येतच होत्या! त्यालाही इतिहास आहेच, पण अजिंठ्याबाबत एक भलता वेगळा पर्याय वापरून पाहिला गेला. त्याची सविस्तर कथा पुढच्या वेळी.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि

Tuesday, 27 April 2021

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज

समाजाच्या इतिहासाची जपणूक करणारा 'हेळवी समाज' व्हिडिओ पाहण्याासाठी या निळ्या अक्षरावर क्लीक करा
epaper08:48 PM Jan 27, 2021 | सामना ऑनलाईन
      
 प्रणव पाटील 
दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरात कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळव्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला.

हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदीबैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी. त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय. कारण मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हिंदुस्थानच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे अलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांकडे आले.

हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भलेथोरले जनावर. नंदीबैलाचे आकर्षण थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे. अंगापिंडाने मजबूत असणारा पांढराशुभ्र नंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. हेळव्यांचा पोषाखही तसाच लक्षवेधी आहे. डोक्याला लाल, गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे (हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता.), हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात. नंदीबैलावर रंगीत चित्रांची काशिदीकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात. गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा. हेळवी बैलावर बसून गावात आले, की हां हां म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळते. गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात. हेळवीदेखील गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात.

हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात. ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा जलद असतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही. साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट; त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे. प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मुळाचा मूळपुरुष, मूळगाव सांगतात. एखादे वूâळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का व कसे आले ते सांगतात. यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते. पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात. वंशावळीतील नावे मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते. हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते; परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते. एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात. लग्न, मुलाचा जन्म या नोंदींमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात.

पूर्वी, हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाNयांना गुरू म्हणतात.
मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळजवळ संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी ती काही प्रमाणात चालू आहे. पूर्वी त्यांचे वेंâद्र कासेगाव, जि. सांगली हे होते. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे वेंâद्र बेळगाव (कर्नाटक) हे असून मूळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर; परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वज्र्य आहे; महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा पवित्रवार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात. ते सोमवारी बैलावर बसत नाहीत. हेळवी लोक त्यांचे आडनाव ‘हेळवी’ असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते, तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते. दक्षिण महाराष्ट्रात हेळवी परंपरा भक्कम लोकाश्रयामुळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे ती इतरत्र तशीच चालू राहावी याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझ्या वंशावळीच्या शोधात मी अनेकदा हेळव्यांकडे गेलो. त्यांनी माझा प्रेमाने पाहुणचार केला व माहिती पुरवली, त्याबद्दल मी मायप्पा हेळवी व बाबू हेळवी यांचा आभारी आहे.

हेळवी समाजाच्या काही समस्या –
– शालेय शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या सततच्या भटकंतीमुळे नगण्य आहे.र्
– त्यांना जातींच्या सरकारी सवलती व योजना यांची माहिती नाही.र्
– हेळवी समाज कर्नाटकात संघटित आहे; परंतु महाराष्ट्रात तो संघटित नाही.र्
– काही गावांचे हेळवी अकाली गेल्यामुळे त्या गावी दुसऱ्या हेळव्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.र्
– हेळवी परंपरा सांभाळण्यासाठी मुलगाच हवा या धारणेमुळे त्यांच्यात अपत्यांचा जन्मदर अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन करणे गरजेचे आहे.र्
– महाराष्ट्रात काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येतात आणि वंशावळीची नोंद ठेवतात, काही ठिकाणी त्यांचे येणे बंद झाले आहे. तेथे हेळव्यांची नेमणूक व्हावी.
– हेळव्यांना कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे


Wednesday, 21 April 2021

Link for free journals for research

 Dear All,

For researchers, academicians, students and knowledge seekers, here are 20 open access journals which may be of your interest. 


1.  Taylor & Francis 

https://www.tandfonline.com/openaccess 

2.  ELSEVIER 

https://www.elsevier.com/about/open-science/open-access/open-access-journals 

3.  WILEY 

https://authorservices.wiley.com/open-research/open-access/index.html 

4.  SPRINGER 

https://www.springeropen.com/ 

5.  SCIENCE OPEN 

https://www.scienceopen.com/ 

6.  SCIENCE DIRECT 

https://www.sciencedirect.com/browse/journals-and-books 

7.  JSTOR

https://about.jstor.org/oa-and-free/ 

8.  (OAL) OPEN ACCESS LIBRARY 

http://www.oalib.com 

9.  OXFORD ACADEMIC 

https://academic.oup.com/journals/pages/open_access  

10.  LUND UNIVERSITY LIBRARIES 

https://www.lub.lu.se/en/services-support/publishing-registering/open-access 

11.  KARGER

https://www.karger.com/OpenAccess 

12.  THIEME OPEN 

https://open.thieme.com/web/19/home 

13.  OMNICS OPEN ACCESS

https://www.omicsonline.org/ 

14.  BMC

https://www.biomedcentral.com/  

15.  MDPI 

https://www.mdpi.com/about/journals 

16.  COGENT OA 

https://www.cogentoa.com/ 

17.  OPEN ACCESS

https://www.omicsonline.org   

18.  ERUDIT 

https://www.erudit.org/en/  

19.  HIGHWIRE  

https://www.highwirepress.com/ 

20.  DIRECTORY OF OPEN SCIENCE ARTICLES

https://www.doaj.org/ 


Hope these journals may be of your help to carry out your research work.

Monday, 19 April 2021

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021 निमित्त प्रश्न मंजूषा स्पर्धा Quiz Competition on the occasion of Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2021

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगरच्या वतीने बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित *बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२१* आयोजित केली आहे.

 ही स्पर्धा निशुल्क आहे. 

पहिल्या १०० सहभागी विद्यार्थ्यांना ई सर्टिफिकेट त्यांच्या मेलवर येईल. 


त्यासाठी इमेल आयडी व्यवस्थित टाका.


 सर्टिफिकेट न आल्यास उद्या पुन्हा प्रयत्न करा किंवा आम्ही दुसरी लिंक पाठवू.

प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा, 

आयोजक:
डॉ सुरेखा गांगुर्डे, इतिहास विभाग प्रमुख
डॉ कृष्णा पाटील


Featured Post

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

  🌟 इतिहास विषय P ractical प्रॅक्टिकल  - परीक्षेचे स्वरूप :•    •             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical / प्...

Popular Posts