Thursday 4 August 2022

2. हुमायून व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०)

प्रकरण १. इ हुमायून  व शेरशहा संघर्ष : (इ.स. १५३२ - १५४०) 


बाबरच्या मृत्युनंतर त्याचा वडील मुलगा नासिरुद्दीन महंमद हुमायून इ.स. १५३० मध्ये दिल्लीचा सम्राट झाला. गादीवर आल्यानंतर हुमायूनला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. 


१. हुमायून पुढील अडचणी : 


  • हुमायूनने आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे काबूल व पंजाब हे प्रांत कामरानला दिले. हिंदालला संबळची सुभेदारी दिली आणि मिर्झा अस्करीस मेवाडची जहागिर दिली. पूढे हे भाऊ स्वतंत्र झाल्याने हुमायूनचे मोठे नुकसान झाले काबूल व पंजाब ताब्यात न राहिल्याने तिकडून येणारे काटक व शूर सैन्य हुमायुनला मिळणे कठीण झाले. भावाच्या स्वार्थी धोरणाकडे दुर्लक्ष केले. 

  • बंगाल व बिहारमधील अफगाण सरदार पुर्वीपासुन त्याच्या विरोधात होते. हुमायुनचा कट्टर शत्रू म्हणजे महंमद लोदी त्याने सिहांसनावरील हक्क सोडलेला नव्हता. शेरशहासूर या दुसऱ्या अफगाण अमिरालाही अफगाणांचे स्वतंत्र राज्य स्थापन करावयाचे होते. बंगालचा सुलतान नुसरतशहा हा सुध्दा अफगाणांना मदत करीत होता. 

  • आलमखानने गुजराथचा सुलतान बहादुरशाहचा आश्रय घेतला होता. बहादुरशाहने अफगाणांना पूर्णपणे पाठिंबा दिला त्यामूळे त्याचा ही बंदोबस्त करणे गरजेचे होते. संकटकाळी त्याच्या भावांनाही त्याला मदत केली नाही. म्हणून हुमायुनला बऱ्याच अडचणींनी तोंड द्यावे लागले.



२. चुनारगडचे पहिले युध्द (१५३२):


बाबरच्या मृत्यूनंतर बिहारमध्ये अफगाणांनी पुन्हा डोके वर काढले. महंमद लोदीने प्रचंड सैन्य जमवून जौनपूरवर स्वारी केली. हुमायूनने त्याचा दोहरीयाच्या लढाईत पराभव केला. या लढाईच्या दरम्यान शेरशहा सुरी नावाच्या एका अफगाण सरदाराने चूनारगडच्या किल्ल्यावर चार महिने वेढा दिला. शेवटी समेट होऊन किल्ला शेरशहाकडेच राहिला. चुनारगडसारख्या लष्करीदृष्टया महत्वाचा किल्ला शेरशहाकडे राहू देण्यात हूमायूनने मोठी चूक केली.


३. चूनारगडचे दुसरे युद्ध (१५३७):


हुमायूनचा गुजराथच्या बहादुरशाहशी लढा सुरु झाला. हुमायून गुजरातमध्ये लढण्यात गुतंला आहे हे पाहून शेरशहा सुरीने बिहारमध्ये सत्ता वाढविण्यास सूरुवात केली. जौनपूरच्या मोगल अधिकाऱ्यास त्याने लाच देऊन आपल्या हालचालीचा सुगावा हुमायूनास लागू दिला नाही. अल्पावधीतच शेरशहाने दक्षिण बिहारवर आपला अंमल बसवून बंगालवर शस्त्र उगारले. तेव्हा हुमायून जागा झाला. पुन्हा हुमायुनने चुनारगडाच्या प्रयत्नानंतर किल्ला हुमायूनच्या ताब्यात आला. परंतु तत्पूर्वी शेरशहाने बंगालच्या सुलतानचा पराभव करुन बंगालची राजधानी गौडवर ताबा मिळविला होता.


३. बंगाल विजय (इ.स. १५३८):


चुनारहून हुमायून बनारसला आला. या ठिकाणी शेरशहाने हुमायुनशी बोलणी चालविली. या तहान्वये हुमायुनने बिहार प्रांत आपल्याकडे घ्यावा असे ठरले. परंतु याच्या मोबदल्यात शेरशहाने १० लाख रु. वार्षिक खंडणी द्यावी असेही ठरले. परंतु याचवेळेस बंगालचा सुलतान महंमद याने हुमायुनकडे मदतीची याचना केली. त्याच्या विनंतीला मान देऊन हुमायुनने तहाची बोलणी बंद करुन बंगाल जिंकण्याचे ठरविले अल्पशा प्रतिकारानंतर हुमायून बंगालची राजधानी गौड येथे १५ ऑगस्ट १८३८ रोजी पोहचला तत्पुर्वी शेरशहा गौडमध्ये मिळविलेल्या खजिन्यासह रोहतासगड येथे सुखरूप येऊन पोहचला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे हुमायून येथे आठ महिनेपर्यंत चैन व विलासात मन रहिला. इकडे शेरशहाने बंगालमध्ये हुमायुनची संपूर्ण नाकेबंदी करुन दिल्लीशी असलेला त्याचा संबंध तोडला.


४. चौसाची लढाई (इ.स. १५३९) : 


शेरशहाने हुमायूनचे दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरले असले तरी हुमायूनचे सैन्य आडमार्गाने पूढे सरकत बिहारमधील कर्मनासा नदीजवळ चौसा या ठिकाणी तळ दिला. शेरशहास ससैन्य सर्व तयारीनिशी तेथे दाखल झाला दोन्ही फौजा एक दुसऱ्यासमोर तीन महिनेपर्यंत मुक्काम ठोकून होत्या. वेळ काढण्याकरीता त्याने हुमायूनाशी तहाच्या वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. २५ जून १५३९ रोजी शेरशहाने जाहीर केले की, शहाबाद जिल्हयातील आदिवासींचा बंदोबस्त करण्याकरिता तो जात आहे यामुळे हुमायूनचे सैन्य गाफील राहिले. परंतु त्याच दिवशी रात्रीनंतर शेरशहा परत मागे फिरला. २६ जून १५३९ रोजी सकाळी हुमायूनच्या बेसावधपणे झोपलेल्या सैन्यावर शेरशहाने अचानक तीन बाजूंनी हल्ला केला. हुमायूनच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला. सारेसैन्य पळून गेले. शेरशहाचा प्रचंड विजय झाला. एका पखालजीच्या मदतीने हुमायूनने कशीबशी गंगा नदी ओलांडली आणि स्वतःचे प्राण वाचविले. युध्दाच्या गडबडीत त्याचा जनानखान मागेच राहिला होता. शेरशहाने शाही कुटूंबातीलत सर्व स्त्रियांना सन्मानाने हूमायूनकडे आग्राला परत पाठविले. लढाईत विजयाने शेरशहाचा आत्मविश्वास अधिक वाढला.


५. बिलग्रामची लढाई (इ.स. १५४०) :


चौसाच्या पराभवानंतर हुमायून आग्र्याला आला. शेरशहाच्या वाढत्या शक्तीचा बंदोबस्त कसा करावा हा हुमायूनपूढे पेच होता. यासाठी त्याने सर्व भावांना आग्र्याला बोलविले. परंतु दुर्देवाने कोणत्याही योजनेवर त्याचे एकमत होऊ शकले नाही. कारण भावांची सहानुभूती त्यास कधीच मिळाली नव्हती सन १५४० च्या एप्रिलमध्ये हुमायून सैन्याची जमवाजमव करुन पुन्हा शेरशहाशी सामना करण्यासाठी निघाला. शेरशहाही तयारीनिशी पूढे आला. कनौज जवळील गंगा नदीच्या किनाऱ्यावर बिलग्राम या ठिकाणी दोन्ही सैन्याने समोरासमोर येऊन तळ दिला. १६ मे १५४० रोजी एकाएकी मुसळधार पाऊस पडला. मुघलांची छावणी नदीतीरावरील सखल भागात असल्याने नदीच्या पुराचे पाणी मुघलांच्या छावणीत शिरले. या संधीचा फायदा घेऊन १७ मे १५४० रोजी आफगाण सैन्याने मोगलांवर निरकाचा हल्ला चढविला. या अचानक हल्ल्यामुळे मोगल सैन्यात एकच तारांबळ उडाली. मोगलांचे सर्व सैन्य प्राण वाचविण्यासाठी पळू लागले. त्यांचा दारुण पराभव झाला. हुमायूनही आग्राकडे पळाला. आग्राहून सहकुटुंब खजिन्यासोबत दिल्ली व तेथून रोहटक, सरहिंद ओलांडून लाहोरकडे पळाला. शेरशहा लागोलाग दिल्लीवर चालून आला. हुमायूनच्या भावांनी हुमायूनला आश्रय दिला नाही. शेवटी हुमायूनला वनवास पत्कारावा लागला.


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts