Wednesday, 5 January 2022

भीमा कोरेगाव स्तंभाच्या स्मृतींचा इतिहास- डॉ श्रद्धा कुंभोजकर

भीमा कोरेगाव मधील जयस्तंभ आणि त्याभोवती असणारे स्पर्धक स्मृतींचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या निबंधात केला होता. मूळ निबंध २०१२ मध्ये ईकनॉमिक एन्ड पोलिटिकल वीकली मध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्यात सुधारणा करून केलेला अनुवाद परिवर्तनाचा वाटसरू आणि ऐसी अक्षरे वर २०१८ मध्ये प्रकाशित झाला होता. लेख वाचण्यासाठी इथे clik करा वा 

डॉ श्रद्धा कुंभोजकर

Wednesday, 14 July 2021

4.2 करोड इंग्रजी इ पुस्तके

 4.6 कोटी इंग्रजी अभ्यासाची पुस्तके। सर्व विषयांची।मोफत। राष्ट्रीय डीजीटल वाचनालय । खालील लिंक ओपन करा


https://historydepartmentsardacollege.blogspot.com/p/46-national-digital-library.html

Thursday, 1 July 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सने भरवले ऑनलाइन प्रदर्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मध्ये शिकले, त्या संस्थेनं त्यांची आठवण जागवण्यासाठी हे ऑनलाइन प्रदर्शन तयार केलंय. त्यांनी भरलेल्या प्रवेश अर्जापासून पुढे अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज यात पाहता येतात. आवर्जून पहावे असं प्रदर्शन. 
https://www.lse.ac.uk/library/whats-on/exhibitions

Tuesday, 22 June 2021

स्थानिक इतिहास: पळाशी गावचे कलावैभव- भूषण देशमुख

येथे क्लिक करा
पळशीचं शिल्पवैभव
-----
वर्षासहलीचा आनंद घेण्याबरोबर अदभूत शिल्पसौंदर्याची अनुभूती घ्यायची असेल, तर एखादा रविवार पळशीसाठी राखून ठेवा. पारनेर तालुक्यातलं हे छोटसं गाव कल्याण-निर्मल या भारताच्या पूर्व आणि पश्चिमेकडील दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टाकळी ढोकेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूनं दगडी तटबंदी असलेली अशी गावं आज दुर्मिळ झाली आहेत. वेशीचे चार दरवाजे बंद केले की, पूर्वी गाव एकदम सुरक्षित बनत असे. होळकरांचे कर्तबगार दिवाण असलेल्या पळशीकरांनी हे गावं वसवलं, तिथं देखणे चारमजली भव्य वाडे उभारले. दोनशे-सव्वादोनशे वर्षांपूर्वी उत्तर पेशवाईत बांधलेल्या या वास्तू पाहिल्या, की पुण्यातला शनिवारवाडा कसा असेल, याची कल्पना येते. या वाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं असलेली काष्ठशिल्पं. सागवानी लाकडात कोरलेली अशी शिल्पं महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. हत्ती, घोडा, वानर, मासा याबरोबरच विविध प्रकारची फळं आणि फुलांची गुंफण इथं पहायला मिळते. त्यातील डाळिंब तर चक्क हलतं. साखळी इतकी नजाकतीनं कोरली आहे, की ती खरीखुरी भासावी. काही मानवी आकारही आहेत. त्यातील मूल घेतलेली महिला बघण्यासारखी आहे. केळी किंवा सुरूसारखी पानं कोरलेले बारा खांब लाजवाब. वरच्या मजल्यावर रंगमहाल आहे. त्याच्या सुबक लाकडी कमानी अजून शाबूत आहेत. मात्र, भिंतीवर काढलेली मराठा, माळवा शैलीतली चित्रं पुसली जाऊन नव्यानं कुणी आपली कला पेश केली आहे. या वाड्यातलं देवघरं आवर्जून बघायला हवं. तिथलं नक्षीकाम केलेलं लाकडी छत हल्लीच्या पीआेपीला लाजवेल असं आहे. या देवघरात ‘वासुदेव प्याला’ होता. तान्ह्या बाळकृष्णाला घेऊन यमुना आेलांडणारा वासुदेव त्यात दाखवलेला होता. या प्याल्यात पाणी अोतायचं. कृष्णाच्या पायाला पाणी लागलं, की ते अोसरतं, याचा अनुभव मी मागच्या भेटीत घेतला होता. या रविवारी ‘स्वागत अहमदनगर’ हेरिटेज वाॅकमध्ये मात्र हा वासुदेव प्याला पाहता आला नाही. मालकांनी तो नेला, असं समजलं. या वाड्याची काळजी गणेशदेवा पोळ घेतात. या वाड्याची दुरूस्ती सध्या सुरू असल्यानं आणखी काही शतकं हे वैभव आपल्याला पाहता येईल. या वास्तूजवळच असलेला वाडा आर्किटेक्ट लक्ष्मणराव पळशीकर यांनी छान जपला आहे. पूर्वजांनी दिलेलं संचित कसं जपावं, याचा आदर्श या दाम्पत्याकडून घ्यावा. 

गावाच्या वेशीबाहेर ‘धाकटी पंढरी’ म्हणून अोळखलं जाणारं पळशीकरांनी बांधलेलं विठ्ठल मंदिर आहे. राही आणि रूख्मिणीसमवेत असलेल्या या विठ्ठलाचं दर्शन घेतलं, की चहुबाजूनं फिरत तिथलं शिल्पसौैंदर्य डोळ्यांत साठवावं. चारही बाजूंना बुरूज असलेल्या तटबंदीच्या दर्शनभागी उत्तर हिंदुस्थानी शैलीतलं सुरया आणि देवतांच्या मूर्ती असलेलं प्रशस्त प्रवेशद्वार आणि शेजारी पुष्करणी आहे. नऊविध विद्यांच्या प्रतीक असलेल्या नऊ पायऱ्या चढून गेलं, की अठरा पुराणांचे प्रातिनिधीक स्वरूप असलेले अठरा खांब आणि त्याखाली असलेले विशाल दगडी कासव दिसतं. गाभाऱ्यात प्रवेश करताना रिद्धी-सिद्धी आणि ६४ योगिनी आपलं लक्ष वेधून घेतात. पांडुरंगाच्या प्रभावळीवर मत्स्य, कच्छादी दशावतार कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर आणि कळसावर असलेली शिल्पं हे इथलं खरं वैभव आहे. यातील काही शिल्प मिनीएचर म्हणावीत, इतकी आकारानं लहान आहेत. नीट निरखून पाहिलं, तरच त्यातलं सौंदर्य लक्षात येतं. मोरांचे असंख्य आकार त्यात आहेत. पोपट आहेत, कारंजी आहेत. झुंजणारे हत्ती तर अप्रतिम. झाशीच्या राणीसारखी पाठीशी मूल घेऊन घोड्यावरून लढणारी वीरांगना इथं आहे, भाल्यानं शिकार करतानाचं शिल्प आहे. नगरच्या किल्ल्यांवर आढळणारं शक्तीसामर्थ्य दाखवणारं पायाखाली हत्ती आणि वरच्या बाजूला आकारानं मोठ्या असलेल्या सिंहाचं शिल्प या मंदिराच्या कळसाच्या समोर विराजमान झालं आहे.

 केवळ छन्नी आणि हातोडी वापरून दोन शतकांपूर्वी माळवा प्रांतातून आलेल्या शिल्पकारांनी या कलाकृती घडवल्या. सुशोभीकरण म्हणून काहींवर अलिकडे अाॅईलपेंट लावण्यात आला असला, तरी तो काढून मूळ स्वरूपात हे शिल्पवैभव जपण्यात येणार असल्याचं समजलं. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन बंधाऱ्यांमुळं पळशीचं जलदुर्भिक्ष्य तर दूर झालंच आहे, शिवाय या मंदिराला सुरेख असं जलवैभव प्राप्त झालं आहे. पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवणाऱ्या आनंदराव रामराव पळशीकरांच्या घरातील दोन सतींचं स्मारक आणि मंदिरं पलिकडं आहेत. जीर्णोद्धारामुळं ही मंदिरंही नव्यानं सजली आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. सगळं वर्ष घरात बसून काढल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठी, जगण्याचा नवा अर्थ शोधण्यासाठी कुठं जायचं असेल, तर पळशी हे उत्तम ठिकाण आहे....

भूषण देशमुख
अहमदनगर
bhushandeshmukh07@gmail.com

(छायाचित्रे `स्वागत अहमदनगर हेरिटेज वाॅक`च्या सदस्यांनी काढलेली आहेत.)


Friday, 18 June 2021

साधना साप्ताहिक जुने अंक

साधना साप्ताहिक जुने अंक

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे

शिवाजी महाराजांची तीन नवी चित्रे
अहमदनगर कॉलेजच्या माजी इतिहास विभाग प्रमुख *प्रा. डॉ. वृषाली सुधीर तारे  यांचे चिरंजीव श्री. प्रसाद तारे* यांनी *छ.शिवाजी महाराजांच्या* तीन चित्रांचे संशोधन केले आहे. प्रसाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून टाटा टेक्नॉलॉजी मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
नगरच्या सुपुत्राला हार्दिक शुभेच्छा.
डॉ. वृषाली तारे मो.नं.91 90110 73115

Tuesday, 25 May 2021

शोध अजिंठ्याचा- प्रदीप आवटे यांचा लोकसत्ता मधील लेख

अजिंठ्याच्या गुंफा आणि वाघुर नदी दाखवणारे हल्लीचे छायाचित्र; भूशास्त्र-अध्यापक आणि प्रस्तरतज्ज्ञ मनोज ना. बागडे यांनी अजिंठा प्रस्तरांना असलेल्या धोक्याबाबत लिहिलेल्या विद्वन्मान्य अभ्यासनिबंधातून 

|| प्रदीप आपटे

अजिंठ्याच्या गुंफा ‘दिसल्या’, त्या निजामी आणि मराठी मुलखावर कंपनीचा पूर्ण अंमल आल्यानंतर वर्षभरात! मग पुढली सुमारे ३५ वर्षे या अद्भुत लेण्यांचा अभ्यासच ब्रिटिशांकडून- अधूनमधून सुरू होता. लेण्यांचे जतन व्हावे, ही भावना मूळ धरू लागली होती…

सन १८१९. जेम्स स्मिथ, निजामशाही भागातला मद्रास रेजिमेंटचा एक ब्रिटिश सैन्याधिकारी. वाघुर नदीकाठाने वाघाचा शिकारी पाठलाग करीत चालला होता. वाघ हुलकावणी देत दिसेनासा झाला. नीट नजरेस पडत नव्हता. त्याच्या कानावर एका स्थानिक पोऱ्याचा आवाज आला. तो पोरगा त्याला वाघ कुठे असेल याची चाहूल सांगत होता. तेवढेच साहेबाकडून बक्षिसी मिळेल या आशेने! पोरगा खुणावत होता त्या दिशेने स्मिथने नजर टाकली. नदीकाठाला लगटून उंचीवर अर्धगोल डोंगर पसरला होता. स्मिथने नीट न्याहाळलं. तर त्याच्या नजरेस सोनेरी पिवळसर आणि लाल डाग दिसला तोही खांबाच्या आड आणि मधोमध! स्मिथच्या लक्षात आले इथे काही तरी प्राचीन वास्तू आहे. त्याचे डोळे लकाकले. त्याने दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांतले लोक हाताशी घेतले. झाडझाडोरा, काटेकुटे निवारत त्या कड्याच्या दिशेने वाट धरली. नदीच्या वरच्या बाजूला घोड्याच्या नालासारखा अर्धगोल कडा होता. आणि त्या कड्याची रांग धरून काही गुंफा होत्या. एका गुंफेत त्याने पाऊल टाकले. आणि पलित्याच्या प्रकाशात पाहिले. समोर काय नजरेस पडणार असे काहीच स्मिथच्या ध्यानीमनी नव्हते. नजरेस पडला भिंतीवरचा सात्त्विक तेजाचा एक चेहरा… या अचानक बुद्धदर्शनाने स्मिथ भांबावला. या एकाएकी लाभलेल्या साक्षात्कारी लाभाने तो हुरळून गेला. आनंदाच्या भरात त्याने नको तो मूर्ख उन्माद केला. तिथल्या भित्तिचित्रावर आपले नाव कोरून टाकले!

स्मिथला जे गवसले त्याचा पुरेसा बोलबाला झालाच. त्यानंतर १८२४ साली स्कॉटलंडमधील सर जेम्स अलेक्झांडर हा लष्करी अधिकारी या गुंफा बघण्यासाठी अजिंठ्याला भेट द्यायला आला. या गुंफांबद्दल अधिक सविस्तर वर्णन त्याने लिहिले. (ट्रान्झॅक्शन्स ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट बिटन अँड आयर्लंड (१८२९) मध्ये हे प्रसिद्ध झाले आहे.) त्याने सर्वच्या सर्व गुंफा पूर्णतया निरखलेल्या नव्हत्या. जे जे डोळा भरून पाहिले आणि रेखाटून घेता आले त्यावरचे हे छोटेखानी, नऊ-दहा पानांचे टिपण आहे. तिथले कडुनिंब, मोह आणि बाभळी वृक्ष, विस्कट माजलेली गवते आणि झुडपांनी बुजबुजले रान, त्या खोऱ्यात जमेल तशी क्रूर वाटमारी करणारे भिल्ल, श्वापदांचे भय आणि या सगळ्याला न जुमानता अलेक्झांडरने जोडीला घेतलेली गावकरी फौज… शिकारकथा वाटावे असे वर्णन त्याने लिहिलेल्या टिपणात सुरुवातीला आहे. त्याला त्या काळात ठाऊक असलेल्या बुद्ध, जैन आणि वैदिक परंपरांचे तुलनात्मक वर्णन आहे. सयाम, ब्रह्मदेशातील बुद्ध उपासनांचे वर्णन आहे. तेथील चित्रांची त्या चित्रांतल्या मनुष्याकृती, त्यांच्या हालचाली आणि हावभाव, आसनाची ढब, अलंकार आणि त्यावरली त्याची संक्षिप्त टिप्पणी अशा सगळ्या तपशिलांनी हे टिपणात भरले आहे. उदा. चित्रांमधल्या स्त्री-पुरुषांचे कुरळे वर्तुळवृत्ती केस, त्यांच्या केशभूषा, तुलनेने ठसठशीत जाडसर ओठ यामुळे त्याला ते आफ्रिकन ठेवणीचे वाटले! प्रवेशद्वार कमानींची ठेवण कार्ले आणि कान्हेरी लेण्यांशी मिळतीजुळती आहे. नीटसे रेखाटलेले हत्ती, घोडे, त्यावरचे स्वार, टक्कर जुंपलेले मेंढे आणि कोंबड्या यांची रेखाटने. त्याला विशेष वाटले ते म्हणजे त्रिशुळी भाले! त्याने विशेष वाद्यासंबंधी निरीक्षण नोंदले आहे. ‘हे एक गाण्याच्या साथीचे वाद्य आहे आणि त्याला तीन तारा आहेत’ असे तो नोंदतो! तीनतारी वाद्य म्हणजे ‘सेह तार’! (फारसीतले सेह म्हणजे तीन! सेह अधिक तार हा सितार/ सतारचा मूळ शब्द आहे. किन्नरांच्या हातातील वाद्य आकाराने प्रचलित सरोदशी मिळतेजुळते आहे.) भित्तिचित्रांमधल्या प्रमुख रंगछटा, त्यामधील लाल रंगाचा बलवत्तरपणा असे किती तरी तपशील त्याने अधोरेखिलेले आहेत. तेथील चतुष्स्तंभी रचना, त्यावरील उभे कंगोरे, त्यांचे ग्रीक व रोमन शैलींशी असलेले साधम्र्य आणि वैधम्र्य याकडेही त्याने लक्ष वेधले आहे.

त्याने आत शिरल्यावर जे काही भव्यदिव्य पाहिले त्याने तो भारावून गेला होता. त्याने जवळचे वेरुळदेखील पाहिले होते. पण त्याला अजिंठामधील कला अधिक उच्चतर, कल्पक आणि पाहणाऱ्याला निराळी मनोवस्था प्राप्त करून देणारी वाटली. आपण बघितले ते फार निराळे उच्च दर्जाचे प्राचीन स्मारक आहे. ते आणखी नीट बघितले पाहिजे याची त्याला जाणीव होती. तो खेदाने लिहितो, ‘हाती असलेल्या वेळेमध्ये जेवढे जमेल तेवढे मी बघितले. माझी रजा जवळजवळ संपत आली आहे. येथून निघणे क्रमप्राप्त आहे, पण मला इथे पुन्हा यायलाच पाहिजे आणि मी येईनच.’

या भारावलेल्या वर्णनांबरोबरीने त्याच्या कथनामध्ये लेण्यांची विदारक अवस्थासुद्धा तितकीच ठाशीव वर्णिलेली आहे. गुंफांमध्ये वाटमारी करणाऱ्यांच्या वर्दळीच्या खुणा दिसत होत्या. या गुंफा त्यांच्या लपून दबा धरण्याच्या, तात्पुरत्या वस्तीच्या अशा जागा बनल्या होत्या. त्यांच्या विझलेल्या शेकोट्या, छताला धरलेली मधमाश्या आणि गांधीलमाश्यांची पोळी, धुळीत आणि वाळक्या चिखलात उमटलेले श्वापदांच्या पायांचे ठसे तिथे जागोजागी होते. एवढेच काय एका माणसाचा अवघा अतूट सांगाडा होता! त्यावर विशेष म्हणजे त्याचा पोर्तुगीजांवरील शेरा! तो म्हणतो, ‘पोर्तुगीजांच्या तावडीत आलेल्या अन्य धर्मीयांच्या वास्तूंची जशी वाट लागते तसे इथे अजून झालेले नाही. सुदैवाने इथल्या चित्रांवर पोर्तुगीजांचा भ्रष्ट विद्रूप करणारा हात चाललेला नाही!’ हे लिहिताना बहुधा त्याच्या मनांत घारापुरी लेण्यात पोर्तुगीज सैनिकांनी केलेला विच्छेदी पराक्रम असावा. त्यांनी आपले नावे कोरली होतीच. शिवाय नेम धरून गोळीबाराचा सराव करायला ते तिथल्या मूर्तींचा वापर करीत.

अर्थात, असे नतद्रष्टपण पोर्तुगीजांनी बुद्ध्याच केले. ख्रिस्तेतर धर्मांची प्रार्थनास्थळे, मानचिन्हे, खुणा, संस्कार पाळामुळांसह उपटून टाकण्याचे धर्मवेड हे त्यांच्या साम्राज्याचे एक अधिष्ठान होते. (शतकानुशतके आपसांत धर्मयुद्ध लढणाऱ्या कर्मठ ख्रिस्ती आणि इस्लामचा हा गुण मात्र अगदी समान होता!) पण धर्मवेड नसले तरी पुरातन वारशाच्या जपणुकीची आस्था नसणारे नतद्रष्ट काही ब्रिटिशदेखील होते. पुरातन स्थळांचा वारसा जपण्याबद्दल आपली राजवट जागरूक आहे असा कंपनी सरकारचा पवित्रा असला तरी काही अधिकारी त्याला लीलया हरताळ फासत! सर जॉन माल्कम यांच्या आज्ञेवरून सातारा गादीवरच्या रेसिडेन्टचा शल्यवैद्य डॉ. बर्ड अजिंठ्याला पाहणीसाठी गेला होता. त्याने तेथील चार चित्रांचे पापुद्रे काढून पाहिले आणि चित्रे विद्रूप झाली. त्यावर कडी म्हणजे हे लोण नंतर भेट देणाऱ्या प्रेक्षकांनीदेखील जारी ठेवले! भेट दिलेल्या या स्थळाचे स्मरणचिन्ह म्हणून घेऊन जायला ते असे तुकडे खुडायचे! पुरेशी बक्षिसी दिली की तिथे नेमलेला ‘राखणदार’च त्यांना मदत करे! काही काळानंतर राल्फ नावाच्या ब्रिटिशाने अजिंठ्याला भेट दिली तेव्हा हे विद्रूपीकरण उघडकीला आले. याबद्दलची राल्फची तक्रार आणि टिपण जेम्स प्रिन्सेपने थेट ‘जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी’मध्ये प्रसिद्ध केले. जेम्स फग्र्युसननेसुद्धा याबद्दल जोरदार आवाज उठविला. १८३९ मध्ये मद्रास लष्करामधला लेफ्टनंट ब्लेक याने अजिंठ्यावर अधिक विस्तृत वर्णन करणारा मोठा लेख ‘बॉम्बे कुरिअर’मध्ये प्रकाशित केला. १८४३ साली जेम्स फग्र्युसनने या सर्व लेण्यांची बारकाईने पाहणी केली. त्यातले वास्तुशास्त्र तपशिलाने रेखाटले. ही माहिती लिहिण्यासाठी, संकलित करून सादर करण्यासाठी त्याला सर्व लेण्यांचे नकाशे आणि क्रम नोंदणे गरजेचे होते. त्यांचा चंद्रकोरीसारखा काठावरचा क्रम धरून त्याने रस्त्यांवरच्या घरांना द्यावे तसे लेण्यांना क्रमांक देऊन टाकले (असे त्याने स्वत:च लिहिले आहे!) आणि तेच आजतागायत रूढ झाले.

अशा प्राचीन काळाच्या वारसा-स्मारकांचे जतन, संरक्षण, जपणूक ही जुनाट चिरकाळी दुखण्यासारखी समस्या आहे. काही ना काही काळाने ती डोके वर काढतेच! अगदी चार-पाच वर्षांपूर्वी धाराशिव (उस्मानाबाद) इथल्या लेण्यांची पावसाने खचून होणारी पडझड, स्थानिक गुंड आणि हौशी पर्यटक यामुळे होणारी दुर्दशा यांच्या बातम्या येतच होत्या! त्यालाही इतिहास आहेच, पण अजिंठ्याबाबत एक भलता वेगळा पर्याय वापरून पाहिला गेला. त्याची सविस्तर कथा पुढच्या वेळी.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि

Tuesday, 27 April 2021

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज

समाजाच्या इतिहासाची जपणूक करणारा 'हेळवी समाज' व्हिडिओ पाहण्याासाठी या निळ्या अक्षरावर क्लीक करा
epaper08:48 PM Jan 27, 2021 | सामना ऑनलाईन
      
 प्रणव पाटील 
दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरात कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळव्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला.

हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदीबैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी. त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय. कारण मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हिंदुस्थानच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे अलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांकडे आले.

हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भलेथोरले जनावर. नंदीबैलाचे आकर्षण थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे. अंगापिंडाने मजबूत असणारा पांढराशुभ्र नंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. हेळव्यांचा पोषाखही तसाच लक्षवेधी आहे. डोक्याला लाल, गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे (हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता.), हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात. नंदीबैलावर रंगीत चित्रांची काशिदीकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात. गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा. हेळवी बैलावर बसून गावात आले, की हां हां म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळते. गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात. हेळवीदेखील गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात.

हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात. ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा जलद असतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही. साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट; त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे. प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मुळाचा मूळपुरुष, मूळगाव सांगतात. एखादे वूâळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का व कसे आले ते सांगतात. यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते. पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात. वंशावळीतील नावे मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते. हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते; परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते. एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात. लग्न, मुलाचा जन्म या नोंदींमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात.

पूर्वी, हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाNयांना गुरू म्हणतात.
मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळजवळ संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी ती काही प्रमाणात चालू आहे. पूर्वी त्यांचे वेंâद्र कासेगाव, जि. सांगली हे होते. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे वेंâद्र बेळगाव (कर्नाटक) हे असून मूळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर; परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वज्र्य आहे; महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा पवित्रवार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात. ते सोमवारी बैलावर बसत नाहीत. हेळवी लोक त्यांचे आडनाव ‘हेळवी’ असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते, तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते. दक्षिण महाराष्ट्रात हेळवी परंपरा भक्कम लोकाश्रयामुळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे ती इतरत्र तशीच चालू राहावी याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझ्या वंशावळीच्या शोधात मी अनेकदा हेळव्यांकडे गेलो. त्यांनी माझा प्रेमाने पाहुणचार केला व माहिती पुरवली, त्याबद्दल मी मायप्पा हेळवी व बाबू हेळवी यांचा आभारी आहे.

हेळवी समाजाच्या काही समस्या –
– शालेय शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या सततच्या भटकंतीमुळे नगण्य आहे.र्
– त्यांना जातींच्या सरकारी सवलती व योजना यांची माहिती नाही.र्
– हेळवी समाज कर्नाटकात संघटित आहे; परंतु महाराष्ट्रात तो संघटित नाही.र्
– काही गावांचे हेळवी अकाली गेल्यामुळे त्या गावी दुसऱ्या हेळव्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.र्
– हेळवी परंपरा सांभाळण्यासाठी मुलगाच हवा या धारणेमुळे त्यांच्यात अपत्यांचा जन्मदर अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन करणे गरजेचे आहे.र्
– महाराष्ट्रात काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येतात आणि वंशावळीची नोंद ठेवतात, काही ठिकाणी त्यांचे येणे बंद झाले आहे. तेथे हेळव्यांची नेमणूक व्हावी.
– हेळव्यांना कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे


Wednesday, 21 April 2021

Link for free journals for research

 Dear All,

For researchers, academicians, students and knowledge seekers, here are 20 open access journals which may be of your interest. 


1.  Taylor & Francis 

https://www.tandfonline.com/openaccess 

2.  ELSEVIER 

https://www.elsevier.com/about/open-science/open-access/open-access-journals 

3.  WILEY 

https://authorservices.wiley.com/open-research/open-access/index.html 

4.  SPRINGER 

https://www.springeropen.com/ 

5.  SCIENCE OPEN 

https://www.scienceopen.com/ 

6.  SCIENCE DIRECT 

https://www.sciencedirect.com/browse/journals-and-books 

7.  JSTOR

https://about.jstor.org/oa-and-free/ 

8.  (OAL) OPEN ACCESS LIBRARY 

http://www.oalib.com 

9.  OXFORD ACADEMIC 

https://academic.oup.com/journals/pages/open_access  

10.  LUND UNIVERSITY LIBRARIES 

https://www.lub.lu.se/en/services-support/publishing-registering/open-access 

11.  KARGER

https://www.karger.com/OpenAccess 

12.  THIEME OPEN 

https://open.thieme.com/web/19/home 

13.  OMNICS OPEN ACCESS

https://www.omicsonline.org/ 

14.  BMC

https://www.biomedcentral.com/  

15.  MDPI 

https://www.mdpi.com/about/journals 

16.  COGENT OA 

https://www.cogentoa.com/ 

17.  OPEN ACCESS

https://www.omicsonline.org   

18.  ERUDIT 

https://www.erudit.org/en/  

19.  HIGHWIRE  

https://www.highwirepress.com/ 

20.  DIRECTORY OF OPEN SCIENCE ARTICLES

https://www.doaj.org/ 


Hope these journals may be of your help to carry out your research work.

Monday, 19 April 2021

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021 निमित्त प्रश्न मंजूषा स्पर्धा Quiz Competition on the occasion of Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2021

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगरच्या वतीने बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर आधारित *बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२१* आयोजित केली आहे.

 ही स्पर्धा निशुल्क आहे. 

पहिल्या १०० सहभागी विद्यार्थ्यांना ई सर्टिफिकेट त्यांच्या मेलवर येईल. 


त्यासाठी इमेल आयडी व्यवस्थित टाका.


 सर्टिफिकेट न आल्यास उद्या पुन्हा प्रयत्न करा किंवा आम्ही दुसरी लिंक पाठवू.

प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा, 

आयोजक:
डॉ सुरेखा गांगुर्डे, इतिहास विभाग प्रमुख
डॉ कृष्णा पाटील


Sunday, 28 March 2021

'झुंज नियतीशी' या शिवचरित्राच्या लेखिका मेधा कुलकर्णी यांची प्रसाद बेडेकर सर यांनी घेतलेली मुलाखत


 शिवाजी महाराजांचे एक आगळे-वेगळे चरित्र मूळच्या नगरच्या असलेल्या लेखिका मेधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे. त्यांनी इतिहास आणि साहित्य यांची सांगड घालून 'challenging Destiny' या नावाने इंग्रजीत व 'झुंज नियतीशी' या नावाने मराठीत लिहले आहे. या पुस्तकाचा व लेखिकेचा परिचय नगरचे प्रसिद्ध मुलाखतकार प्रसाद बेडेकर यांनी लेखिकेची मुलाखत घेऊन करून दिला आहे. ती मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.https://youtu.be/QXizqscVzm4


Saturday, 13 March 2021

शेतकऱ्यांनी सावकारांची नाक का छाटली? हा दै लोकसत्ता मधील डॉ श्रद्धा कुंभोजकर यांचा लेख

शेतकऱ्यांनी सावकारांची नाक का छाटली? डॉ श्रद्धा कुंभोजकर,

 दै लोकसत्ता

श्रद्धा कुंभोजकर

१९ व्या शतकात- सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी आर्थिक पिळवणूक करणारे सावकार आणि इंग्रज सरकार यांच्या निरंकुश सत्तेला आव्हान देण्याची हिंमत केली होती. त्यास जोडून झालेल्या अनेक उद्रेकांना मिळून दख्खनचे दंगे किंवा खतफोडीचे बंड म्हणून ओळखले जाते. पुढे २० व्या शतकातही- मुळशी सत्याग्रह तसेच खोतीप्रथेविरुद्धच्या लढय़ाच्या रूपाने शेतकऱ्यांनी अन्यायाविरोधात उभे ठाकण्याची संघर्षवृत्ती दाखवली; आणि ती आता २१ व्या शतकात दिल्लीच्या वेशींवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांतही दिसते आहेच.. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांतला हा सातत्यपूर्ण संवाद उलगडून दाखविणारा लेख..

Monday, 22 February 2021

शिव चरित्रातून काय धडा घ्याल? - डॉ कृष्णा पाटील

शिव चरित्रातून काय धडा घ्याल? - डॉ कृष्णा पाटील 
आज शिवजयंती आहे. नक्कीच उत्साहात साजरी केली पाहिजे मात्र त्याच वेळी शिवचरित्रातून विद्यार्थी, व्यक्ती, समाज आणि राज्यकर्ते काय धडा घेऊ शकतील याचा विचार झाला पाहिजे.

भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासात ५० हजार पेक्षा जास्त राजे होऊन गेले, पण या सर्वांच्या जयंती आपण साजरे करत नाही, इतकेच काय या राजांचे वंशजही त्यांची आठवण काढत नसतील, त्यांच्या समाध्यावर वर्षानुवर्षे कोणी साधी पणतीही लावत नसेल. मग अशा स्थितीत शिवाजी महाराजांच्या हयातीत व मृत्युनंतरही इतके लोकप्रेम का भेटतय, शिवजयंती एवढ्या मोठ्या उत्साहात आपण का साजरी करत आहोत याचे चिंतन होणे आवश्यक आहे.

आणि हो, शिवजयंतीच्या उत्साहात आपल्याला शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचा विसर पडू नये म्हणून मला ‘शिव चरित्रातून समाजातील प्रत्येक घटकांनी काय धडा घ्यावा’ यावर विचार करावा वाटला तोच मी तुमच्यासमोर मांडत आहे.

पहिला प्रश्न शिवाजी महाराजांकडून राज्यकर्त्यांनी काय धडा घ्यावा?

भारतातील दोन राजांची मी उदाहरणे देतो,
एक होता हैद्राबादचा निजाम ज्याच्या टेबलवर पेपरवेट म्हणून जो दगड ठेवला होता... तो आठ कोठीचा हिरा होता.....राजा श्रीमंत होता म्हणून तो आठ कोटीचा हिरा टेबलावरचे पेपर उडू नयेत म्हणून ठेऊ शकला मात्र हा पैसा आला कुठून ... प्रजेकडून, प्रजेला त्रास देऊन ....आणि त्याचा वापर मात्र स्वत:च्या शौकासाठी... हे योग्य आहे का? 

दुसरा जुनागढचा नवाब ज्यांन आपल्या लाडक्या कुत्र्याच लग्न लावण्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले ....हा प्रजेचा पैसा त्याने आपल्या फालतू छंदावर खर्च केला.. यातून प्रजेला काय फायदा झाला.. निश्चितच काही नाही. 

अशा राजांच त्यांच्या प्रजेने स्मरण का कराव ज्यांनी लोकांच्या कल्याणाची काळजी केली नाही. राज्याचा वापर स्वत:साठी केला. 

राज्य का कराव ? असा प्रश्न यांना पडला असेल तर त्यांनी स्वत:ची तुंबडी भरायला असा सरळ अर्थ लावला...

या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज का राज्य करत होते? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास ..त्यांच्या राजमुद्रेत व त्यांच्या कार्यात त्याच उत्तर आपल्याला सापडत.... महाराजांच्या राजमुद्रेच्या शेवटच्या ओळी आहेत.... ‘मुद्रा भद्राय राज्यते’ याचा अर्थ होतो... ही  मुद्रा लोक कल्याणासाठी कार्यरत आहे. म्हणजे शिवाजी महाराज जे राज्य करत होते. ते इथल्या रयतेसाठी, प्रजेसाठी, लोकांसाठी होय.. म्हणून तर त्यांच्या प्रत्येक निर्णयात, लढ्यात त्याचा प्रतिबिंब उमटत....

शिवाजी महाराजांनी १६७३ साली आपल्या सैन्याला उद्देशून एक जाहीरनामा काढला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे  ‘रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका’....’सैन्यातील घोड्यांना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी करा’.... साहजिकच रयतेला जराही त्रास देऊ नका अशी महाराजांची आज्ञा होती. ते पुढे  म्हणतात.. तुम्ही जर रयतेस त्रास दिलात तर रयत म्हणेल, .... ‘मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही’... थोडक्यात मोगल व स्वराज्याचे सैन्य यात फरक काय असा प्रश्न रयत विचारेल. म्हणून रयतेला काडीचाही त्रास होईल असे वर्तन करू नका अशी महाराजांची सक्त ताकीद होती. यामुळेच शिवाजी महाराजांचे राज्य खऱ्या अर्थाने ‘रयतेचे राज्य’ म्हणून ‘स्वराज्य’ होते. लोकांना ते आपले राज्य वाटत होते.

नुकतच इशा अंबानीचा लग्न झाल, त्यात अमिताभ बच्चन वाढपी होता, शाहरुख ते सर्व बॉलीवूड वरातीत नाचले, या लग्नात ७३२ कोटी रुपये खर्च झाले,

चार ते पाच वर्षापूर्वी अजीज प्रेमजी यांच्या मुलाच लग्न झाल या लग्नात ‘आपली उपस्थिती हाच आहेर’ अशी टीप छापली होती. जर आहेर द्यायचीच इच्छा असेल तर रोख रक्कम द्या ती सामाजिक कार्याला देणगी म्हणून दिली जाईल अशी आणखी एक टीपही छापली होती. लग्न एकदम साधेपणे पार पडले. २० कोटी रुपये जमा झाले ते २०० शाळांच्या डिजिटलायजेशन साठी वापरण्यात आले.

यातील कोणत लग्न भारी अस तुम्हाला वाटत?
नक्कीच दुसर ज्यातून लोकांच कल्याण साधल...
तशी राज्य करण्याची संधी अनेक राजांना मिळाली मात्र ते राज्य लोकांच्या कल्याणसाठी राबवल ते शिवाजी महाराजांनी...

म्हणून आजच्या राज्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देटाला हात लावू नका असा आदेश दिला होता. त्यांचा वारसा सांगणारे आपण देटासहित तर भाजी खात नाही न!, आपल्याला मिळालेली सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी वापरत आहोत न का स्वत:च्या. हे ध्यानात घेऊन राज्य केले पाहिजे 

सोबत शिवाजी महाराजांची धर्मसहिष्णुता, स्त्रीयांप्रती आदरभाव, अठरापगड जातीच्या मदतीने स्वराज्याची उभारणी, आरमाराची उभारणी, व्यापारास प्रोत्साहन, प्रजेच्या रक्षणासाठी केलेली किल्ल्यांची उभारणी याचाही वसा व वारसा आजच्या राजकर्त्यांनी घ्यावा.

शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यावा ?

शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ‘स्वराज्य’ स्वप्न पहिले आपले ध्येय निश्चित केले. तस तुम्हीही तुमच ध्येय निश्चित करा... ध्येयाशिवाय जगणं हे जगणंच नसत अस मला वाटत

स्वराज्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी महाराजांनी अखंड व प्रचंड मेहनत घेतली. तशी तुम्हीही तुमच ध्येय प्राप्त करण्यासाठी अहोरात्र तन, मन, धन अर्पण करून मेहनत घ्या.. ध्येय प्राप्ती होईपर्यंत कष्ट थांबवू नका..

शिवाजी महाराजांकडून नियोजन शिका, आत्मविश्वासाच बाळकडू घ्या ....

आणि ज्या दिवशी तुमच ध्येय सिद्ध होईल तीच शिवाजी महाराजांना जयंतीची तुमच्याकडून दिलेली सर्वोत्कृष्ट शुभेच्छा ठरेल... असा धडा शिवचरित्रातून घ्या.
धन्यवाद!

Featured Post

🌟Practicals- इतिहास-भारताची राष्ट्रीय चळवळ (१९२० ते १९४७) History- Indian National Movement

  🌟 इतिहास विषय P ractical प्रॅक्टिकल  - परीक्षेचे स्वरूप :•    •             इतिहास विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना practical / प्...

Popular Posts