Sunday 28 August 2022

G. औरंगजेबाचा राज्यविस्तार

 G. औरंगजेबाचा राज्यविस्तार 

 

औरंगजेब (इ.स. १६५८-१७०७) हा मोगल वंशातला शेवटचा प्रतापी सम्राट होऊन गेला. सुमारे ५० वर्षे त्याने भारताच्या एका विशाल प्रदेशावर राज्य केले. शहाजहानचा हा तीन नंबरचा मुलगा असून त्याने सम्राट होण्याच्या महत्वाकांक्षेमूळे आपल्या तीन भावांचा नायनाट करुन आणि बापाला कैदेत टाकून सत्ता मिळविली. आलमगिरी हे नाव धारण करुन तो इ.स. १६५८ मध्ये गादीवर बसला. वारसा युध्दाच्या रणधुमाळीने साम्राज्य अस्ताव्यस्त झाले होते. म्हणून त्याने सर्वप्रथम राज्यात सुव्यवस्था स्थापण्याचा प्रयत्न केला.

 

औरंगजेबाचा साम्राज्यविस्तार

 

१.      आसाम आणि कुचबिहार :

सम्राट औरंगजब गादीवर आल्यानंतर उत्तर पूर्वेकडील सीमेच्या संरक्षणाकडे लक्ष दिले. वारसा हक्काच्या युध्दामुळे निर्माण झालेला गोंधळाचा फायदा घेऊन आसाम व कुचबिहारच्या अहोम शासकांनी स्वतंत्र होण्याचे ठरविले. कुचबिहारचा शासक प्रेमनारायण याने शेजारचा काही मोगल प्रदेश ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाल केली. इ.स. १६५८ मध्ये त्याच्या सैन्याने आसामची राजधानी गोहाटी ताब्यात घेऊन प्रचंड लूट केली. तेव्हा प्रेमनाराणचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मीरजुमलाची बंगालच्या सुभेदारपदी नेमणूक केली. परंतु विशेष काही साध्य न होताच इ.स. १६६३ मध्ये मीरजुमलाचा मृत्यु झाला.

 

२.      शाहिस्तखान व छतगावचा विजय:

 मीरजुमलाचा मृत्युनंतर औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानची नेमणूक बंगालच्या राज्यपालपदी केली. इ.स. १६६५ मध्ये आरकानच्या राजाचा पराभव करुन आसामच्या बाह्य ठाण्यांवर कब्जा केला. इ.स. १६६६ च्या जानेवारी मध्ये त्याने छतगाव ताब्यात घेऊन त्याचे 'इस्लामाबाद’ असे नामकरण आणि अहोम राजे यांच्यातील संघर्ष अनेक वर्ष चालू होता. शेवटी इ.स. १६८१-८२ मध्ये अहोम शासकांनी सम्राटाशी तह केला. केले.

 

३.      पोर्तुगीजांचा बंदोबस्त :

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगाल प्रातांत पार्तुगीजांनी फार उच्छाद मांडला होता. बंगाल प्रांतातील लोकांना ते पकडत. त्यांना बाटवत व गुलाम म्हणून विकत. शाहिस्ताखानने या पोर्तुगीज चाच्यांविरुध्द सागरी मोहिम काढून त्यांचा पराभव केला. त्याने छतगाव हे मोगल लष्कराचे मुख्य ठाणे करुन पोर्तुगीज चाच्यांची पाळेमुळे खणून काढली. व हजारो बंगाली शेतकरी गुलांमाची पोर्तुगीज चाच्यांच्या तावडीतून मुक्तता केली.

 

४.     वायव्य सरहद धोरण :

वायव्य सरहद्दीवरील भटक्या पठाण टोळ्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांकरिता एक कायमस्वरुपी डोकेदुखी होती. हा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे हे टोळीवाले आसपासच्या प्रदेशात सदैव जाळपोळ, लुटालुट व कत्तल करुन आपला उदरनिर्वाह करीत असत. या टोळ्यापैंकी खटक आफ्रीडी व युसुफजाई या जाती विशेष कडव्या होत्या. दिल्ली आणि काबुलचा मार्ग सुरक्षित ठेवण्याकरीता मोगल सम्राटांची त्यांना पैसे देण्यास सुरुवात केली. इ.स. १६६७ मध्ये युसुफजाई टोळीप्रमुखाने मुघलांच्या पेशावर, अटक व हजारा जिल्ह्यात लुटालुट करुन धुमाकुळ घातला होता. औरंगजेबाने अमीनखानास ससैन्य घेऊन पाठविले. अमीनखानने युसुफजाई टोळीत इतकी दहशत निर्माण केली की बराच काळपर्यंत त्यांनी डोके वर काढले नाही. पूढे आफ्रीडी टोळीप्रमुख अकमलखानने बंड करुन सुभेदार अमीनखानास पकडले. बरेच द्रव्य घेतल्यानंतर त्यास सोडण्यात आले. शेवटी स्वतः औरंगजेब टोळीवाल्यांचा बंदोबस्तासाठी आला. त्याने कारस्थान, फंदफितुरी व पैसा चारुन टोळीवाल्यांशी समेट केला. अमीनखानच्या प्रयत्नामुळे टोळीवाले शेवटी शरण आले. इ.स. १६७५ पर्यंत औरंगजेब वायव्य सरहद्दीवर शांतता निर्माण करु शकला परंतु टोळीवाल्यांचा बिमोड करण्यात राज्याची अपार संपत्ती व प्राणहानी झाली.

============================================


No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts